शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

केडीएमसीची प्लास्टीक विरोधात कारवाई वसूल केला २५ हजार रुपयांचा दंड

By मुरलीधर भवार | Updated: January 11, 2024 16:33 IST

प्लास्टीकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कल्याण -कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही व्यापारी प्रतिबंधित प्लास्टीकचा वापर करीत असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आज कारवाई करण्यात आली.

व्यापाऱ्यांकडून २ किलो ३०० ग्रॅम प्लास्टिक जप्त केले आहे. प्लास्टीकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जे व्यापारी प्लास्टीक पिशव्यांचा वापर करीत होते. त्या ७५ व्यापाऱ्यांना महापालिकेने महिला बचत गटाकडून तयार करण्यात आलेल्या ७५० कापडी पिशव्या दिल्या आहेत. राज्य सरकारने मार्च २०१८ पासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तरी देखील त्याचा वापर केला जात आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यावधी रुपयांच्या शेतमालाची उलाढाल होते. त्यासाठी शेतमाल पाच ते दहा किलो देण्याकरीता व्यापारी प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करतात. त्यांनी प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद करावा.

व्यापारी वर्गाकडून कापडी पिशवी दिली जावे. ग्राहकांनी प्लास्टीक पिशवीच दिली नाही तर ग्राहक कापडी पिशवीचा वापर करतील याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष वेधले आहे. विक्रेता आणि ग्राहकाकडे प्लास्टिक पिशवी आढळून आल्यास पहिला गुन्हा पाच रुपये दुसरा गुन्हा दहा हजार रुपये आणि तिसरा गुन्हा २५ हजार रुपये दंड आकारला जातो. नागरीकांनी आणि व्यापारी वर्गाने प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्याचा वापर करुन अप्रिय दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण