शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

 बसेस भंगारात काढण्याचे नियम धाब्यावर बसविल्याने केडीएमसी वादाच्या भोवऱ्यात

By मुरलीधर भवार | Updated: November 16, 2023 19:47 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नादुरुस्त बसेस भंगारात काढण्यासाठीचे सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नादुरुस्त बसेस भंगारात काढण्यासाठीचे सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. तत्कालीन परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी नियम धाब्यावर बसविले. बसेस भंगारात काढण्याच्या प्रक्रियेत प्रक्रियेत अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा सहभाग असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे.

केडीएमसीच्या महासभेत नादुरुस्त बस स्क्रॅप करण्यासाठीचा ठराव परिवहन उपक्रमाकडून ११ फेब्रुवारी २०२० रोजी सादर करण्यात आला. या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. परिवहन उपक्रमाचे तत्कालीन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी बसेस भंगारात काढण्याचटे नियम धाब्यावर बसवुन महापालिकेस लागू असलेले नियम जोडून महासभेतील नगरसेवकांची दिशाभूल केली आहे. परिवहन उपक्रमातील बसेस मोडीत काढण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता.

सरकारी परिपत्रकात ट्रक किंवा बस किमान एक लाख किलोमीटर अथवा पंधरा वर्षे एवढा कालावधी उलटून गेला असल्यास बसेस मोडीत काढण्याचे धोरण आहे. परिवहन उपक्रमातील बसेस मोडीत काढण्यासंदर्भात जो ठराव मंजूर झाला. त्यातील बसेस दोन्ही निकषात बसत नसूनही १६ कोटी रक्कम स्वीकारण्याच्या अटीवर या बसेस मोडीत काढल्या जात आहेत.

 बसेसचे लॉग बुक किलोमीटर किंवा कालावधी या दोन्ही निकषात या बसेस बसत नसतील तर या बसेस मोडीत काढण्याचा ठराव भ्रष्ट आणि गैरमार्गाने केला असल्याचा आरोप घाणेकर यांनी केला आहे.या प्रक्रियेत सहभागी असेलले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखळ करुन त्यांची चौकशी करावी असे निवेदन परिवहन व्यवस्थापकांना घाणेकर यांनी दिले आहे. यासंदर्भात केडीएमटीचे व्यवस्थापक दीपक सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घाणेकर यांचे निवेदन मला प्राप्त झाले आहे. त्यानुसार चौकशी करुन चौकशी अंती काही अनुचित आढळून आल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका