शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे अग्निशमन दल अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज; ताफ्यात ५५ मीटरची उंच शिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:25 IST

७० मीटर उंच शिडी घेण्याचा प्रस्ताव, मनपा हद्दीतील आगीच्या घटनांचा साप्ताहिक अहवाल दरमहिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जातो.

मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील शहरीकरण वाढत असून, उंच इमारती उभ्या राहत आहेत. औद्योगिक कारखान्यांच्या दोन वसाहती, शाळा, कॉलेज, रुग्णालये असा भला मोठा परिसर आहे. मनपा क्षेत्रात कल्याण जंक्शन हे मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक तसेच आठहून जास्त स्थानके येतात. मनपा क्षेत्राचा हा विचार करता मनपाचे अग्निशमन दल सज्ज आहे.

अग्निशमन दलाकडे पुरेसा कर्मचारीवर्ग आणि साधनसामग्री आहे. मनपा हद्दीत आजमितीस चार अग्निशमन केंद्रे आहेत. तसेच अन्य एक अग्निशमन केंद्र टिटवाळा परिसरात उभारले जात आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यावर त्यासाठी कर्मचारीवर्गाची गरज लागणार आहे. केडीएमसीचे अग्निशमन दल केवळ मनपा क्षेत्रातील नागरिकांसाठी काम करत नाही, तर गरज भासल्यास अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी धाव घेत असते. चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा अग्निशमन दलाचा प्रयत्न असतो.

पुरेसे कर्मचारी महापालिका हद्दीत चार अग्निशमन केंद्रे आहेत. त्यात ११९ कर्मचारी कार्यरत आहे. टिटवाळा येथे आणखीन एक केंद्र उभारले जात आहे. त्यासाठी कर्मचारी लागणार आहेत. त्यांची भरती लवकरच केली जाईल. त्यामुळे सद्य:स्थितीत कर्मचारीवर्गाची वानवा नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

आगीच्या ३५० घटनामनपा हद्दीतील आगीच्या घटनांचा साप्ताहिक अहवाल दरमहिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जातो. मनपा हद्दीत वर्षभरात लहानमोठ्या ३५० पेक्षा जास्त आगीच्या घटना घडतात. ऑक्टोबरमध्ये एक इमारत कोसळली होती. तसेच मेट्रो पोलिटीयन कंपनीत एक भीषण आग लागल्याची घटना होती.

अत्याधुनिक साहित्यअग्निशमन दलाकडे ५५ मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी असून, त्याद्वारे सतराव्या मजल्यापर्यंत पोहोचता येते. आगीच्या घटनेत उंच मजल्यावर अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी या शिडीचा उपयोग होतो. ७० मीटर उंचीची शिडी घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आहे. प्रशासनाची मान्यता मिळताच ही शिडी घेतली जाईल. 

 मनपा हद्दीत आणखीन सात ठिकाणी अग्निशमन केंद्रे हवी आाहेत. मात्र, ते भविष्यासाठी नियोजन असेल. सध्याची अग्निशमन केंद्रे ही पुरेशी आहेत. नव्या केंद्रानुसार आणखीन १०० कर्मचारी लागू शकतात. सध्या पुरेसे मनुष्यबळ, साधनसामग्रीच्या जोरावर अग्निशमन दलाचे कर्मचारी योग्य प्रकारे त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. - दिलीप गुंड, मुख्य अग्निशमन अधिकारी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाFire Brigadeअग्निशमन दल