शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रस्ते प्रकल्प बाधितांचा विकल्प जाणून घेण्यासाठी केडीएमसीचे आजपासून शिबीर

By मुरलीधर भवार | Updated: January 3, 2024 20:16 IST

महापालिकेने केंद्र सरकारच्या योजनेतून बीएसयूपी योजनेत शहरी गरीबांकरीता घरे बांधली आहेत.

कल्याण- रस्ते प्रकल्पात बाधित झालेल्याना बीएसयूपी योजनेतील घरे देण्याचे ठरले आहे. मात्र काही बाधितांनी त्यांना आहे त्याच जागे किवा घरापासून जवळच असलेल्या ठिकाणी घर दिले जावे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यांची मागणी नेमकी काय आहे. याबाबत त्यांनी त्यांचा विकल्प जाणून घेण्याकरीता उद्या ४ ते ६ जानेवारी दरम्यान शिबीर आयोजित केले आहे अशी माहिती महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली आहे.

महापालिकेने केंद्र सरकारच्या योजनेतून बीएसयूपी योजनेत शहरी गरीबांकरीता घरे बांधली आहेत. ही योजना केंद्राची असल्याने ती घरे लाभार्थी व्यतिरिक्त अन्य कोणाला ही देता येत नाही. मात्र महापालिकेच्या हद्दीतील विविध रस्ते प्रकल्प राबवित असताना जे लोक बाधित झाले. त्यांना बीएसयूपी प्रकल्पातील घरे देण्याची मागणी होत होती. तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांगडे यानी या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता . त्याला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर मागच्या वर्षी रस्ते प्रकल्प बाधिताना घरे देण्याकरीता सोडत काढली होती.

दरम्यान उच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी देताना घरे वाटपास न्यायालयाने स्थगिती दिली हाेती. ही स्थगिती उठविण्यात आल्याने रस्ते प्रकल्पातील २८७ बाधितांचे घर देण्यासंदर्भात करारनामे करण्यास प्रशासनाने सुरुवात केली. त्यापैकी १०८ बाधितांचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले. पण काही रस्ते बाधितांचे असे म्हणणे होते की, त्यांचे पुनर्वसन बीएसयूपी प्रकल्पातील घरांमध्ये न करता आहे त्याच ठिकाणी करण्यात यावे. अथवा आहे त्या घराच्या अंतरापासून जवळच्या ठिकाणी करण्यात यावे. घरासंदर्भात बाधितांना काही आपेक्ष असल्यास त्यांनी महापालिकेस लेखी कळवावा. त्यांचा विकल्प काय आहे हे जाणून घेण्यासाठी ४ ते ६ जानेवारी दरम्यान शिबीर घेतले जाणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली