शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

स्मशानभूमीच्या समस्येवरून केडीएमसी प्रशासन घेणार महत्वपूर्ण निर्णय - आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 16:38 IST

Kalyan- Dombivli: स्मशानभूमीत 24 तास कर्मचारी तैनात करण्यात येणार असून सर्व स्मशानभूमीमध्ये लाकडं पुरविण्याची सोय देखील करण्यात येणार आहे.

- मयुरी चव्हाण   कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांची संख्याही वाढत आहेे.

स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी अनेक मृतदेह वेटींग वर असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून  येते. याबाबत सोशल मीडियावरदेखील नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्मशानभूमीच्या समस्येकडे "लोकमत" ने  विशेष लक्ष वेधले होते. येणाऱ्या काळात या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पालिका प्रशासन  महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे  अशी माहिती  केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी "लोकमतला" दिली आहे.

स्मशानभूमीत 24 तास कर्मचारी  तैनात करण्यात येणार  असून सर्व स्मशानभूमीमध्ये लाकडं पुरविण्याची सोय देखील करण्यात येणार आहे. तसेच  गॅस शवदाहिनीची  संख्या वाढविण्याचा देखील प्रयत्न प्रशासन करणार आहेत. काही स्मशानभूमीमधील स्टँड हे दुरुस्त केले जाणार  असून त्या ठिकाणीही अंत्यसंस्कार करता येणार असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

या सर्व निर्णयांवर चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात  अंत्यसंस्कारासाठी  निर्माण होणाऱ्या समस्या काही प्रमाणात मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली