शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

कल्याण शीळ रस्ते प्रकल्प बाधितांना मोबदला देण्याचा अहवाल अंतिम टप्प्यात

By मुरलीधर भवार | Updated: October 28, 2022 14:27 IST

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे.

कल्याण-भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. कल्याण शीळ रस्ते विकास प्रकल्पातील बाधितांना मोबदला मिळालेला नाही. मोबदला देण्यात यावा याकरीता सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने काटई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. दरम्यान मोबदला देण्यासाठी जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मात्र धरणे आंदोलन सुरुच आहे.

युवा मोर्चाचे प्रमुख गजानन पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. काम आत्तार्पयत ८० टक्के पूर्ण झालेले आहे. मात्र प्रकल्प बाधितांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. मोबदला मिळावा या मागणीसाठी युवा मोर्चाच्या वतीने बेमुदत धरणो आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा३९ वा दिवस आहे. या आंदोलनास बाळासाहेबांच्या शिवसेना युवा मोर्चाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांच्याशी चर्चा केली. प्रकल्प बाधितांना मोबदला देण्यासाठी सरकारने नव्याने गठीत केलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. हा अहवाल तयार होता. त्या आधारे पुढील निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे.

युवा मोर्चाच्या मते १९४७ सालापासून १९९० सालार्पयत कल्याण शीळ रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. या रस्याचे दुपरी, चौपदरीकरण करण्यात आले. त्यानंतर आत्ता सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र रस्ता दुपरी, चौपदरी आणि सहा पदरी करीत असताना बाधितांना मोबदला दिलेला नाही. हा रस्ता आत्ता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. या रस्त्याची जबाबदारी महामंडळाकडे आहे. त्यामुळे रस्ते बाधितांना मोबदला देण्याचा विषय महामंडळाकडून मार्गी लागला पाहिजे. तसेच प्रकल्पाच्या एकूण खर्चात भूसंपादनासाठी लागणारा खर्चही समाविष्ट केला गेला पाहिजे. 

राज्य सरकारने समृद्धी महामार्गातील बाधितांना ज्या प्रकारे मोबदला दिला आहे. त्याच धर्तीवर कल्याण शीळ रस्ते विकास प्रकल्प बाधितांना मोबदला दिला जावा याकडे युवा मोर्चाने लक्ष वेधले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्प बाधितांनी २० वर्षात मोबदल्याचा दावा केला नसेल तर त्यांना मोबदला देता येत नाही असा निकाल दिला आहे. याच निकालाच्या आधारे सरकारने जीआर काढला आहे. मात्र कल्याण शीळ रस्त्याला हा जीआर लागू होत नाही हा मुद्दा देखील युवा मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणBhiwandiभिवंडी