शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कल्याणमध्ये वीज कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

By मुरलीधर भवार | Updated: March 6, 2024 16:42 IST

प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार

कल्याण- विविध मागण्यांसाठी महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी कल्याणमधील महावितरणच्या कार्यालयात बाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

कंत्राटी कामगारांना सरकारकडून वारंवार आश्वासन दिली जातात मात्र कृती समिती सोबत बैठका घेतल्या जात नाहीत ,ठोस निर्णय घेतला जात नाही. या निषेधार्थ वीज कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे. कंत्राटी कामगारांच्या या काम बंद आंदोलनामुळे महावितरणचे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेते ? हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संघटनेच्या वतीने वीज कंत्राटी कामगारांना एकूण पगारात ३० टक्के वेतन वाढ द्यावी, कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा द्यावी ,महावितरण ,महानिर्मिती व महापारेषण अंतर्गत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत आधी कंत्राटी कामगारांना सांगून घ्यावे त्यानंतर उर्वरित भरती प्रक्रिया राबविण्यात यावी या प्रमुख मागण्यांचा इतर काही मागण्या सरकार कडे करण्यात आल्यात . गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनेचा या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे . मात्र अद्यापही आश्वासना पलीकडे कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचा आरोप कामगार संघटनेचे पदाधिकारी मनोज मनुचारी यांनी केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण