शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जल जीवन पाणी याेजनेच्या कामाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी; भाजप आमदार किसन कथाेरे यांचे आवाहन

By मुरलीधर भवार | Updated: April 22, 2023 17:05 IST

मानिवली गावात जल जीवन मिशन अंतर्गत दीड काेटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा याेजना राबविली जात आहे.

कल्याण-ग्रामीण भागातील पाणी टंचाई कायम स्वरुपी नष्ट व्हावी यासाठ जल जीवन मिशन  अंतर्गत प्रत्येक गावाला स्वतंत्र पाणी याेजना मंजूर करण्यात आल्या असून या याेजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केल जावे. याेजनेच्या कामावर विशेषतः महिला वर्गाने लक्ष ठेवावे असे आवाहन भाजप आमदार किसन कथाेरे यांनी येथे केले. 

मानिवली गावात जल जीवन मिशन अंतर्गत दीड काेटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा याेजना राबविली जात आहे. या कामाची पाहणी काल आमदार कथाेरे यांनी केली. या प्रसंगी चंदू बोष्टे, संजय शेलार, निलेश शेलार, रवींद्र घोडविंदे, रेश्माताई मगर, चंद्रकांत गायकर, अरविंद मिरकुटे, सविता मिरकुटे, नवनाथ मिरकुटे , गोरखनाथ बांधणे, जी आर खुटेमाटे आदी मान्यवर उपस्थित हाेते. 

यावेळी कथाेरे यांनी सांगितले की, मानिवली गावात आठ काेटी रुपये खर्च करुन एमएमआरडीएच्या माध्यमातून काॅन्क्रीट रस्ता तयार केला जात आहे. रस्त्याच्या आड येणारी बांधकामे ताेडण्यात यावी. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकरीता एमएमआरडीएने ९५ काेटीचा निधी दिला आहे. दहागांव मधील गावांतर्गत  रस्त्यासाठी   साडेआठ कोटी रुपये मंजूर केले आहेत, तसेच बानधणे पाडा येथेही सिमेंट कॉक्रीट चे रस्ते उभारण्यात येणार आहेत.  

नवगाव व बापसई गावातील रस्त्याची पाहणी करत या दोन्ही गावातील रस्त्यासाठी ५ कोटी निधी मजूर करण्यात आलेला आहे. बापसई येथील व्यायाम शाळेचे उदघाटन आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका