शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुंबईच्या एन्ट्री पाईंटवरील टोल नाक्यावरुन टोल वसूली करणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयात याचिकाकर्ते पुन्हा धाव घेणार

By मुरलीधर भवार | Updated: March 14, 2023 18:17 IST

मुंबई एन्ट्री पॉईंट असलेल्या पाच टोल नाक्यावरील टोल वसूलीस राज्य सरकारने एमएमआरडीएला देण्यास मान्यता दिली आहे.

कल्याण-मुंबई एन्ट्री पॉईंट असलेल्या पाच टोल नाक्यावरील टोल वसूलीस राज्य सरकारने एमएमआरडीएला देण्यास मान्यता दिली आहे. सध्या ही टोलवसूली राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली जात आहे. २०२७ नंतर एमएमआरडीए टोल वसूली करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या आधारे टोल नाक्यावरील टोलवसूलीचे अधिकार राज्य सरकारला मिळताच त्या कायद्यान्वये कॅपीटल आउटले वसूल झाल्या क्षणी टोलवसूली थांबविणे गरजेचे आहे. राज्य सरकारस कोणत्याही संस्थेला टोलवसूलीचा अधिकार उरत नाही. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिली आहे.

याचिकाकर्ते घाणेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ही याचिका २०१२ साली दाखल करण्यात आली होती. आघाडी सरकारकडून केल्या जात असलेल्या टोल वसूलीच्या विरोधात ही याचिका होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे विरोधी पक्षात होते. या याचिकेसंदर्भात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छगला यांच्या खंडपीठाने घाणोकर यांच्यासह शिंदे यांनी एक अधिकृत पत्र पाठविण्यास सांगितले होते. तत्कालीन राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री शिंदे यांनी त्यावर निर्णय घेण्याचे आदेशित केले. प्रशासनाकडून निर्णय घेतला गेला नाही.

पाचही टोल नाक्याच्या प्रकल्पाची कॅपीटल आऊटले आधीच वसूल झाली आहे. राज्य सरकारला टोल वसूलीचा अधिकार सध्या सुद्धा प्राप्त होत नाही. राज्य सरकार एमएमआरडीएला टोल वसूलीचा अधिकार देऊन एक प्रकारे कायद्याचा भंग करणार आहे. आत्ता राज्य रस्ते विकास महांमडळ व २०२७ नंतर एमएमआरडीए टोल वसूल करणार असल्याने नागरीकांच्या माथी टोलचा भार कायम राहणार आाहे. जो बेकायदेशीर आहे. एक याचिका घाणेकर यांची न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयास विरोध केला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात आणखीन एक याचिका दाखल करणार असल्याचे घाणेकर यांनी सांगितले.