शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईच्या एन्ट्री पाईंटवरील टोल नाक्यावरुन टोल वसूली करणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयात याचिकाकर्ते पुन्हा धाव घेणार

By मुरलीधर भवार | Updated: March 14, 2023 18:17 IST

मुंबई एन्ट्री पॉईंट असलेल्या पाच टोल नाक्यावरील टोल वसूलीस राज्य सरकारने एमएमआरडीएला देण्यास मान्यता दिली आहे.

कल्याण-मुंबई एन्ट्री पॉईंट असलेल्या पाच टोल नाक्यावरील टोल वसूलीस राज्य सरकारने एमएमआरडीएला देण्यास मान्यता दिली आहे. सध्या ही टोलवसूली राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली जात आहे. २०२७ नंतर एमएमआरडीए टोल वसूली करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या आधारे टोल नाक्यावरील टोलवसूलीचे अधिकार राज्य सरकारला मिळताच त्या कायद्यान्वये कॅपीटल आउटले वसूल झाल्या क्षणी टोलवसूली थांबविणे गरजेचे आहे. राज्य सरकारस कोणत्याही संस्थेला टोलवसूलीचा अधिकार उरत नाही. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिली आहे.

याचिकाकर्ते घाणेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ही याचिका २०१२ साली दाखल करण्यात आली होती. आघाडी सरकारकडून केल्या जात असलेल्या टोल वसूलीच्या विरोधात ही याचिका होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे विरोधी पक्षात होते. या याचिकेसंदर्भात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छगला यांच्या खंडपीठाने घाणोकर यांच्यासह शिंदे यांनी एक अधिकृत पत्र पाठविण्यास सांगितले होते. तत्कालीन राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री शिंदे यांनी त्यावर निर्णय घेण्याचे आदेशित केले. प्रशासनाकडून निर्णय घेतला गेला नाही.

पाचही टोल नाक्याच्या प्रकल्पाची कॅपीटल आऊटले आधीच वसूल झाली आहे. राज्य सरकारला टोल वसूलीचा अधिकार सध्या सुद्धा प्राप्त होत नाही. राज्य सरकार एमएमआरडीएला टोल वसूलीचा अधिकार देऊन एक प्रकारे कायद्याचा भंग करणार आहे. आत्ता राज्य रस्ते विकास महांमडळ व २०२७ नंतर एमएमआरडीए टोल वसूल करणार असल्याने नागरीकांच्या माथी टोलचा भार कायम राहणार आाहे. जो बेकायदेशीर आहे. एक याचिका घाणेकर यांची न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयास विरोध केला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात आणखीन एक याचिका दाखल करणार असल्याचे घाणेकर यांनी सांगितले.