शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या एन्ट्री पाईंटवरील टोल नाक्यावरुन टोल वसूली करणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयात याचिकाकर्ते पुन्हा धाव घेणार

By मुरलीधर भवार | Updated: March 14, 2023 18:17 IST

मुंबई एन्ट्री पॉईंट असलेल्या पाच टोल नाक्यावरील टोल वसूलीस राज्य सरकारने एमएमआरडीएला देण्यास मान्यता दिली आहे.

कल्याण-मुंबई एन्ट्री पॉईंट असलेल्या पाच टोल नाक्यावरील टोल वसूलीस राज्य सरकारने एमएमआरडीएला देण्यास मान्यता दिली आहे. सध्या ही टोलवसूली राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली जात आहे. २०२७ नंतर एमएमआरडीए टोल वसूली करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या आधारे टोल नाक्यावरील टोलवसूलीचे अधिकार राज्य सरकारला मिळताच त्या कायद्यान्वये कॅपीटल आउटले वसूल झाल्या क्षणी टोलवसूली थांबविणे गरजेचे आहे. राज्य सरकारस कोणत्याही संस्थेला टोलवसूलीचा अधिकार उरत नाही. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिली आहे.

याचिकाकर्ते घाणेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ही याचिका २०१२ साली दाखल करण्यात आली होती. आघाडी सरकारकडून केल्या जात असलेल्या टोल वसूलीच्या विरोधात ही याचिका होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे विरोधी पक्षात होते. या याचिकेसंदर्भात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छगला यांच्या खंडपीठाने घाणोकर यांच्यासह शिंदे यांनी एक अधिकृत पत्र पाठविण्यास सांगितले होते. तत्कालीन राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री शिंदे यांनी त्यावर निर्णय घेण्याचे आदेशित केले. प्रशासनाकडून निर्णय घेतला गेला नाही.

पाचही टोल नाक्याच्या प्रकल्पाची कॅपीटल आऊटले आधीच वसूल झाली आहे. राज्य सरकारला टोल वसूलीचा अधिकार सध्या सुद्धा प्राप्त होत नाही. राज्य सरकार एमएमआरडीएला टोल वसूलीचा अधिकार देऊन एक प्रकारे कायद्याचा भंग करणार आहे. आत्ता राज्य रस्ते विकास महांमडळ व २०२७ नंतर एमएमआरडीए टोल वसूल करणार असल्याने नागरीकांच्या माथी टोलचा भार कायम राहणार आाहे. जो बेकायदेशीर आहे. एक याचिका घाणेकर यांची न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयास विरोध केला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात आणखीन एक याचिका दाखल करणार असल्याचे घाणेकर यांनी सांगितले.