शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

आयुक्तांचा 'तो' निर्णय म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 17:11 IST

आमदार रवींद्र चव्हाण यांची केडीएमसी प्रशासनावर टीका 

लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली 

राज्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. आता या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांन टीका केली आहे.  येत्या 3 महिन्यात कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबत केडीएमसी प्रशासनाने बनवलेला कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. 

  तर वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी विकासाचे व्हिजन आणि विकासाचा दृष्टिकोन ठेऊन अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. विकासाचे व्हिजन कागदावरून प्रत्यक्षात कसे उतरवावे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे वेंगुर्ला शहर आहे. त्याठिकाणी झालेल्या योजना, लोकांना देण्यात आलेल्या सुविधा, निसर्गाचा समतोल राखून करण्यात आलेले व्हिजन आणि नियोजन केडीएमसीतील अधिकारी वर्गाने पाहण्यासारखे असल्याची उपहासात्मक भाष्यही आमदार  चव्हाण यांनी यावेळी केले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत की 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी हर घर दस्तकच्या माध्यमातून केडीएमसी प्रशासनाने घराघरात जाऊन काम केले पाहीजे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा 100 टक्के लसीकरणाच्या दिशेने कशी जाईल यासाठी केडीएमसी प्रशासन का प्रयत्न करत नाही? असा परखड सवाल उपस्थित करत अनधिकृत बांधकामांवरील कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेदेखील उपस्थित होते.