शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

उल्हास नदी पात्रात मिसळणारे सांडपाण्याचे नाले वळविण्याऐवजी केडीएमसीने डेडलाईनच वळवली

By मुरलीधर भवार | Updated: January 17, 2023 17:17 IST

कल्याण - उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ दिवसांचे बेमुदत ...

कल्याण - उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ दिवसांचे बेमुदत उपोषण नदीपात्रात केले होते. त्यावेळी नदी पात्रात मिसळणारे सांडपाण्याचे नाले ३१ मे २०२१ पर्यंत वळविण्यात येतील. नदीचे प्रदूषण रोखले जाईल असे लेखी आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. या आश्वासनाला दोन वर्षे उलटून गेली तरी अद्याप नाले काही वळविले नाही. त्याऐवजी केडीएमसीने डेडलाईनच वळविण्यात धन्यता मानल्याने नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा निकम यांनी दिला आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी २०१६ पासून निकम हे प्रयत्नशील आहे. वारंवार नदीपात्रात त्यांनी उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राजमाची डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी बारमाही नदी असून महत्वाचा जल उद्भव आहे. या नदीच्या पाण्यावर एक कोटी पेक्षा जास्त नागरीकांची तहान भागविली जाते. या नदी पात्रात म्हारळ, गाळेगाव, मोहने या तीन नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न केल्याने नदी पात्रात मिसळते. सांडपाण्याचे नाले वळविण्याचे काम ६१ टक्के पूर्ण झाल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. हे काम ३१ मे २०२१ पर्यंत पूर्ण केले जाईल असे त्यावेळी लेखी सांगण्यात आले. त्याला दोन वर्षे उलटून गेली तरी नाल्याचे सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. 

नदी प्रदूषणामुळे नागरीकांच्या आरोग्यासह जैव विविधता धोक्यात आली आहे. म्हारळ, मोहने आणि गाळेगाव नाले त्वरीत बंद करण्यात यावेत. रासायनिक पाणी नदी पात्रात सोडणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्याचबरोबर उल्हास नदी पात्राच्या पूर नियंत्रण रेषेच्या आत असलेली सर्व बेकायदा बांधकामे तोडण्यात यावीत. या मागण्या निकम यांनी केल्या असून नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याऱ्यांनी निकम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निकम यांनी केले आहे. जीवनवाहिनी असलेली नदी वाचविण्यासाठी सगळयांनी एकत्रित यावे असे निकम यांनी सांगितले. उल्हास नदी आणि वालधूनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारकडे ११०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली