शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदी पात्रात मिसळणारे सांडपाण्याचे नाले वळविण्याऐवजी केडीएमसीने डेडलाईनच वळवली

By मुरलीधर भवार | Updated: January 17, 2023 17:17 IST

कल्याण - उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ दिवसांचे बेमुदत ...

कल्याण - उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ दिवसांचे बेमुदत उपोषण नदीपात्रात केले होते. त्यावेळी नदी पात्रात मिसळणारे सांडपाण्याचे नाले ३१ मे २०२१ पर्यंत वळविण्यात येतील. नदीचे प्रदूषण रोखले जाईल असे लेखी आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. या आश्वासनाला दोन वर्षे उलटून गेली तरी अद्याप नाले काही वळविले नाही. त्याऐवजी केडीएमसीने डेडलाईनच वळविण्यात धन्यता मानल्याने नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा निकम यांनी दिला आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी २०१६ पासून निकम हे प्रयत्नशील आहे. वारंवार नदीपात्रात त्यांनी उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राजमाची डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी बारमाही नदी असून महत्वाचा जल उद्भव आहे. या नदीच्या पाण्यावर एक कोटी पेक्षा जास्त नागरीकांची तहान भागविली जाते. या नदी पात्रात म्हारळ, गाळेगाव, मोहने या तीन नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न केल्याने नदी पात्रात मिसळते. सांडपाण्याचे नाले वळविण्याचे काम ६१ टक्के पूर्ण झाल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. हे काम ३१ मे २०२१ पर्यंत पूर्ण केले जाईल असे त्यावेळी लेखी सांगण्यात आले. त्याला दोन वर्षे उलटून गेली तरी नाल्याचे सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. 

नदी प्रदूषणामुळे नागरीकांच्या आरोग्यासह जैव विविधता धोक्यात आली आहे. म्हारळ, मोहने आणि गाळेगाव नाले त्वरीत बंद करण्यात यावेत. रासायनिक पाणी नदी पात्रात सोडणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्याचबरोबर उल्हास नदी पात्राच्या पूर नियंत्रण रेषेच्या आत असलेली सर्व बेकायदा बांधकामे तोडण्यात यावीत. या मागण्या निकम यांनी केल्या असून नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याऱ्यांनी निकम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निकम यांनी केले आहे. जीवनवाहिनी असलेली नदी वाचविण्यासाठी सगळयांनी एकत्रित यावे असे निकम यांनी सांगितले. उल्हास नदी आणि वालधूनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारकडे ११०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली