शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

उल्हास नदी पात्रात मिसळणारे सांडपाण्याचे नाले वळविण्याऐवजी केडीएमसीने डेडलाईनच वळवली

By मुरलीधर भवार | Updated: January 17, 2023 17:17 IST

कल्याण - उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ दिवसांचे बेमुदत ...

कल्याण - उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ दिवसांचे बेमुदत उपोषण नदीपात्रात केले होते. त्यावेळी नदी पात्रात मिसळणारे सांडपाण्याचे नाले ३१ मे २०२१ पर्यंत वळविण्यात येतील. नदीचे प्रदूषण रोखले जाईल असे लेखी आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. या आश्वासनाला दोन वर्षे उलटून गेली तरी अद्याप नाले काही वळविले नाही. त्याऐवजी केडीएमसीने डेडलाईनच वळविण्यात धन्यता मानल्याने नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा निकम यांनी दिला आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी २०१६ पासून निकम हे प्रयत्नशील आहे. वारंवार नदीपात्रात त्यांनी उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राजमाची डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी बारमाही नदी असून महत्वाचा जल उद्भव आहे. या नदीच्या पाण्यावर एक कोटी पेक्षा जास्त नागरीकांची तहान भागविली जाते. या नदी पात्रात म्हारळ, गाळेगाव, मोहने या तीन नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न केल्याने नदी पात्रात मिसळते. सांडपाण्याचे नाले वळविण्याचे काम ६१ टक्के पूर्ण झाल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. हे काम ३१ मे २०२१ पर्यंत पूर्ण केले जाईल असे त्यावेळी लेखी सांगण्यात आले. त्याला दोन वर्षे उलटून गेली तरी नाल्याचे सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. 

नदी प्रदूषणामुळे नागरीकांच्या आरोग्यासह जैव विविधता धोक्यात आली आहे. म्हारळ, मोहने आणि गाळेगाव नाले त्वरीत बंद करण्यात यावेत. रासायनिक पाणी नदी पात्रात सोडणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्याचबरोबर उल्हास नदी पात्राच्या पूर नियंत्रण रेषेच्या आत असलेली सर्व बेकायदा बांधकामे तोडण्यात यावीत. या मागण्या निकम यांनी केल्या असून नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याऱ्यांनी निकम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निकम यांनी केले आहे. जीवनवाहिनी असलेली नदी वाचविण्यासाठी सगळयांनी एकत्रित यावे असे निकम यांनी सांगितले. उल्हास नदी आणि वालधूनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारकडे ११०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली