शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वेळीच उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू; आईचा आरोप; डॉक्टरांनी केला असा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 02:06 IST

बाळाच्या वारेत रक्तस्त्रव सुरू झाल्याने बाळाला वाचवू शकलो नाही. ही दुदैवी बाब असून त्याचे आम्हालाही दु: ख आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. 

कल्याण पश्चिमेतील पारनाक्यावर असलेल्या अॅपेक्स खाजगी रुग्णालयात, प्रसूतीसाठी भरती झालेल्या महिलेने आपल्यावर वेळीच योग्य उपचार न झाल्याने, जन्माला आलेल्या बाळाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप डॉक्टरांवर केला आहे. मात्र डॉक्टरांनी या महिलेचा आरोप फेटाळून लावत योग्य उपचार केले. बाळाच्या वारेत रक्तस्त्रव सुरू झाल्याने बाळाला वाचवू शकलो नाही. ही दुदैवी बाब असून त्याचे आम्हालाही दु: ख आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. 

कल्याण पश्चिमेतील अशोकनगर वालधूनी परिसरात राहणाऱ्या जयश्री विशाल जपताप हा नऊ नहिच्या गर्भवती होत्या. त्यांचे पती लॉंड्रीत काम करतात. जयश्री यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांना अॅपेक्स रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. सकाळी सात वाजल्यापासून प्रसूतीच्या वेदना होत असल्याने डॉक्टर आल्या. त्यांनी कळा बंद होण्याचे इंजेक्शन दिले त्या गेल्यावर ठाण्याहून भूलतज्ज्ञ आल्या. त्यांना वेळ नसल्याने त्याही निघून गेल्या. आधी सिझोरियन करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर  पुन्हा सोनोग्राफी करुन माझी नॉर्मल डिलीव्हरी केली. पण जन्माला आलेले बाळ मृत होते. डॉक्टरांनी वेळीच उपचार न केल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप जयश्री यांनी केला आहे. 

यासंदर्भात डॉ. मानसी घोसाळकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित महिला ही आठ महिन्याची गरोदर होती. तिला कळा सुरु झाल्या तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरु केले. बाळाच्या वारेत रक्तस्त्रव सुरु झाल्याने बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी झाले होते. तिच्यावर सुरु असलेल्या उपचाराची सर्व कल्पना तिच्या नातेवाईकांसह तिच्या पतीला दिली गेली होती. ही घटना अत्यंत दुदैवी आहे उपचार करुन देखील बाळाला वाचवू शकलो नाही. बाळाला अॅक्सीडेंटल हॅब्रेज झाल्याने बाळ जन्माला आल्यावर त्याला पुन्हा काचपेटी लागू नये याकरीता तिची प्रसूती सिजेरियन ऐवजी नॉर्मल करण्यात आली. त्यामुळे रुग्ण महिलेचा आरोप चुकीचा आहे.

टॅग्स :kalyanकल्याणhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर