शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

‘लोकलमध्ये, स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवावी’; प्रवासी संघटनांची रेल्वेकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 23:46 IST

मुंबई उपनगरीय मार्गावरील रेल्वेस्थानकांतील कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडत आहेत

कुलदीप घायवटकल्याण : आटगाव-कसारादरम्यान लोकलमध्ये रात्री तरुणीचा विनयभंग करण्याची घटना घडली. या घटनेविरोधात प्रवासी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे स्थानकांवर आणि लोकलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

मुंबई उपनगरीय मार्गावरील रेल्वेस्थानकांतील कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडत आहेत. जानेवारी २०२० मध्ये पश्चिम रेल्वेमार्गावरील माटुंगा रोड रेल्वेस्थानकावर एका विकृताने तरुणीचा विनयभंग करण्याची घटना घडली होती. त्यानंतर, तेथील सुरक्षाव्यवस्था वाढवून उपाययोजना केल्या होत्या. मात्र, कल्याण-कसारा, कर्जतकडील रेल्वेमार्गावर सुरक्षाव्यवस्था कमी असल्याचे मत प्रवासी संघटनेने मांडले. सध्या लोकलमधील गर्दी कमी आहे. रात्री महिलांची संख्या कमी असते. त्यामुळे लोकलमध्ये गस्त घालणे आवश्यक आहे. महिला प्रवाशांचा प्रवास हा भयमुक्त करण्यासाठी विशेष पावले उचलणे अपेक्षित आहे. अनेक रेल्वेस्थानकांवर गर्दुल्ले दिसून येतात. त्यांना हटवले पाहिजे. २४ तास रेल्वेस्थानकांवर गस्त गरजेची असल्याचे संघटनेने म्हटले आहे. 

खडवली ते कसारादरम्यान चोरीच्या घटना वाढत आहेत. पहाटे दूधवाले, भाजीपालावाले यांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. पाच वर्षांपासून संघटनेतर्फे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जात आहे. प्रत्येक लोकलमध्ये होमगार्ड, आरपीएफ, एमएफएस यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. - राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण कसारा-कर्जत प्रवासी महासंघ

लोकलमध्ये सर्वसाधारण प्रवाशांना मनाई असताना आरोपी असलेले दोन तरुण लोकलमध्ये चढले कसे? कसारा, कर्जत दिशेकडे लोकल जात असताना लोकलमध्ये प्रवाशांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी लोकलमध्ये असायला पाहिजेत. संबंधित तरुणीला लोकलमधून ढकलून दिले असते, तर प्रशासनाला जाग आली असती का? पकडलेल्या आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. - लता अरगडे, सरचिटणीस, उप.रेल्वे प्रवासी महासंघ

 

टॅग्स :localलोकल