शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण आरटीओ कार्यालयात लायसन रिन्यूसाठी वरिष्ठ लिपिक मागतात जादाचे ५०० रुपये?

By अनिकेत घमंडी | Updated: April 3, 2023 16:42 IST

भाजपची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार, आरटीओ अधिकारी विनोद साळवी करणार चौकशी 

डोंबिवली: डोंबिवली रिक्षा संघटनेच्यावतीने रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीमार्फत कायदेशीर प्रक्रिया करून लायसन रिन्यू असेल बॅच असेल अशी अनेक कामे आपल्या कार्यालयात नियमाप्रमाणे फी भरून सादर केली जातात, मात्र तरीही विशिष्ट व्यक्तींच्या कामाला विलंब केला जातो,कारण आम्ही शासकीय फी व्यतिरिक्त पैसे (जीफॉर्म) देत नाही, त्या कामाचे कल्याण आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदावरील एक महिला अधिकारी ५०० रुपये मागतात, असा आरोप भाजपच्या वाहतूक सेलचे जिल्हाअध्यक्ष दत्ता माळेकर यांनी केला आहे. त्यासंदर्भात माळेकर यांनी सोमवारी कल्याण आरटीओ कार्यालयात निवेदन दिले आहे.

ते म्हणाले की, त्या ठिकाणी त्याच कामासंदर्भात इतरही दलाला मार्फत आलेली कामे पैशाची देवाणघेवाण करून वरिष्ठ लिपिक जलदतेने काम करतात,फक्त भाजप संघटनेच्या रिक्षा चालकांनाच त्यांनी लक्ष्य केले असून त्यांची कामे करण्यास ते अधिकारी टाळा टाळ करत असल्याचे।माळेकर यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात माळेकर यांनी प्रभारी आरटीओ विनोद साळवी यांनी बऱ्याच वेळा भाजपा संघटनेच्या रिक्षा चालकांच्या कामाविषयी फोनवरून तर कधी भेटून त्यांच्याशी बोलणे केले होते. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी समजली पाहिजे जे दलाल त्यांना पैसे(जी फॉर्म) देतात त्याची कामे त्वरित केली जातात असा अन्याय का होतो असा सवाल माळेकर यांनी केला.

ते म्हणाले की, आरटीओ अधिकार्यांना माहीत नसेल प्रत्येक कर्मचारी यांनी पैसे (जी फॉर्म )जमा करण्यासाठी खाजगी माणसे नेमलेली आहेत, जर त्यांना हवे असेल तर व्हिडिओ सहित पुरावे दिले जातील असा दावा माळेकर यांनी केला आहे. अखेर माळेकर म्हणाले की, या खाबूगिरीच्या वृत्तीवर तातडीने चौकशी करून असे प्रकार होत असल्यास ते तातडीने बंद व्हावेत आणि शासकीय फी नुसार काम व्हावी जेणेकरून सामान्यांना दिलासा मिळेल अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, म्हणून पत्राद्वारे कळवत आहोत असेही ते म्हणाले.

आरटीओ अधिकाऱ्यांनी सबधितांना वेळीच योग्य ती समज देऊन योग्य ती कारवाई करावी,अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करून वरिष्ठ पातळीवर न्याय मागवा लागेल, पत्राची दखल घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करून कारभार सुरळीत, पारदर्शक व्हावा असेही ते म्हणाले.

माझ्यापर्यंत टपाल पोहोचलेले नसून अशी कोणाची तक्रार असेल तर त्याची सखोल चौकशी करून योग्य ती सुधारणा केली जाईल. सगळ्या कर्मचार्यांसह अधिकाऱ्यांची मिटींग लावली आहे. विनोद साळवी, प्रभारी आरटीओ अधिकारी, कल्याण

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली