शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

"कल्याण- शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 6, 2024 15:17 IST

हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.

कल्याण : कल्याण-शिळ रस्त्यावर कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहेत. हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी रस्ते उपलब्ध करुन द्यावेत. हे काम तळोजापासून सुरु करण्यात यावे. कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंंट कॉंक्रिटीकरणापैकी ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम भूसंपादन अभावी रखडले आहे. रस्ते बाधितांना ३०० कोटी रुपयांचा मोदबला देणे बाकी आहे. हा मोबदला तातडीने देऊन रस्ते विकासाचे रखडलेले काम मार्गी लावावे. २७ गावांची नगरपालिका करण्याचा विषय न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असले तरी २७ गावांपैकी महसूली उत्पन्न देणारी ९ गावे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात ठेवली आहेत. याशिवाय १४ गावे वगळून ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली आहे. २७ आणि १४ गावांप्रकरणी सरकारकडून ठाेस भूमिका घेतली जात नाही. २७ गावात एमएमआरडीए आणि म्हाडा यांच्याकडून गृह संकुले उभारली जात आहे. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघाचा काही भाग ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि प्राधिकरणाकडून विकास कामांचे नियोजन शून्य आहे. २७ गावात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामात समन्वयाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यासह गटारांची कामे केले आहे. ती पुन्हा खोदून करावा लागत आहेत. डोंबिवली जिमखान्यासमाेरचा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या तीन महिन्यात तो रस्ता खोदावा लागला. तो पुन्हा केला जात आहे. मात्र अशा प्रकारे बेजबादारपणे काम करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रस्त्यांच्या कामांना कोणत्याही प्रकारचा दर्जा राहत नाही. त्यामुळे ठाणे आणि कल्याण डाेंबिवली महापालिका ह्द्दतील रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे.अमृत पाणी पुरवठा योजना ही पाणी विरतण व्यवस्था समक्ष करण्यासाठी आहे. या योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण झालेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी काही गावात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. त्यामुळे नागरीकांकडून आंदोलने केली जात आहेत याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटीलvidhan sabhaविधानसभा