शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

"कल्याण- शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 6, 2024 15:17 IST

हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.

कल्याण : कल्याण-शिळ रस्त्यावर कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहेत. हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी रस्ते उपलब्ध करुन द्यावेत. हे काम तळोजापासून सुरु करण्यात यावे. कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंंट कॉंक्रिटीकरणापैकी ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम भूसंपादन अभावी रखडले आहे. रस्ते बाधितांना ३०० कोटी रुपयांचा मोदबला देणे बाकी आहे. हा मोबदला तातडीने देऊन रस्ते विकासाचे रखडलेले काम मार्गी लावावे. २७ गावांची नगरपालिका करण्याचा विषय न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असले तरी २७ गावांपैकी महसूली उत्पन्न देणारी ९ गावे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात ठेवली आहेत. याशिवाय १४ गावे वगळून ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली आहे. २७ आणि १४ गावांप्रकरणी सरकारकडून ठाेस भूमिका घेतली जात नाही. २७ गावात एमएमआरडीए आणि म्हाडा यांच्याकडून गृह संकुले उभारली जात आहे. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघाचा काही भाग ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि प्राधिकरणाकडून विकास कामांचे नियोजन शून्य आहे. २७ गावात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामात समन्वयाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यासह गटारांची कामे केले आहे. ती पुन्हा खोदून करावा लागत आहेत. डोंबिवली जिमखान्यासमाेरचा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या तीन महिन्यात तो रस्ता खोदावा लागला. तो पुन्हा केला जात आहे. मात्र अशा प्रकारे बेजबादारपणे काम करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रस्त्यांच्या कामांना कोणत्याही प्रकारचा दर्जा राहत नाही. त्यामुळे ठाणे आणि कल्याण डाेंबिवली महापालिका ह्द्दतील रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे.अमृत पाणी पुरवठा योजना ही पाणी विरतण व्यवस्था समक्ष करण्यासाठी आहे. या योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण झालेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी काही गावात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. त्यामुळे नागरीकांकडून आंदोलने केली जात आहेत याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटीलvidhan sabhaविधानसभा