शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : शर्तभंग नियमित करण्याचा प्रस्ताव दिला नाही तर ५९२ भूखंड होणार सरकार जमा?

By मुरलीधर भवार | Updated: November 22, 2022 18:01 IST

प्रांत कार्यालयाकडून नियमानुकूल प्रस्तावांची छाननी सुरु, प्रांत कार्यालयात एकच गर्दी

कल्याण-सरकारने सोसायट्यांना वापरासाठी जे भूखंड दिले होते. त्या सोसायटी धारकांकडून हे भूखंड बिल्डरला विकसित करण्यासाठी दिले. काहींनी ते स्वत: विकसित केले. सरकारने दिलेल्या अटी शर्तीचा भंग झाला आहे. अशा शर्तभंग झालेल्या सोसायटीधारकांनी दंडात्मक रक्कम भरुन त्यांचा भूखंड नियमित न केल्यास त्यांचा भूखंड हा सरकार दफ्तरी जमा करुन घेतला जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे. या प्रस्तावांची छाननी कल्याण प्रांत कार्यालयाकडून सुरु करण्यात आली आहे. ही छाननी करुन घेण्यासाठी शर्तभंगाची नोटीस प्राप्त झालेल्या सोसायटीधारकांची प्रांत कार्यालयात कालपासून एकच गर्दी पाहावयास मिळत आहे.

शर्तभंग झालेल्या सोसायटय़ांना नियमीत करण्यासाठी राज्य सरकारने २०१८ साली अध्यादेश काढला होता. त्यानुसार ही प्रक्रिया सुरु होती. आत्ता शर्तभंग केलेल्या सोसायट्या नियमित करण्यासाठी १४ मार्च २०२३ पर्यंत अखेरची मुदत आहे. या मुदतीपूर्वी प्रस्ताव मंजूर झाले नाही. तर प्रस्ताव सादर न करणाऱ्या सोसायट्यांचे भूखंड हे सरकार दरबारी जमा करुन घेतले जातील. कल्याण तालुक्यात ३९ सोसाट्या आहेत. या सोसायट्यांवर ५९२ भूखंड धारक आहे. कल्याण तहसील कार्यालयाकडून शर्तभंग करणाऱ्या जवळ एक हजार जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहे. त्यानुसार शर्तभंग करणाऱ्या सोसायट्यांकडून नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहे. या प्रस्तावाची छाननी प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी कालपासून सुरु केली आहे. काल १२० जणांनी त्यांची कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर केले. आज जवळपास १०० जण त्यांचे प्रस्ताव छाननीकरीता सादर करणार आहे. छाननीची ही प्रक्रिया आणखीन पाच दिवस सुरु राहणार असल्याची माहिती नायब तहसीलदार रिताली परदेशी यांनी दिली आहे.

अनेक सोसायट्यांनी शर्त भंग आणि नजराण्याची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र छाननीसाठी नोटिसा बजावून छाननीकरीता दिलेली मुदत ही फारच कमी आहे. त्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्यांची एकच धावपळ उडाली आहे. शर्तभंगकरीता दंडाची रक्कम ही जवळपास ६२ टक्के आकारली जात आहे. मात्र नजराण्याची रक्कम ही १५ टक्के आहे. नजराण्याची रक्कम ही सरकारने माफ करावी अशी काही सोसायटीधारकांनी मागणी केली आहे. याचा सरकारने पुनर्विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :kalyanकल्याण