शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

आदिवासींच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार; कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2023 18:31 IST

कल्याण तालुक्यातील आदिवासींनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

मुरलीधर भवार 

कल्याण - कल्याण तालुक्यातील आदिवासींनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातील आहे. तरीपण आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचीत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार. असा इशारा श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सचिव बाळासाहेब भोईर यांनी दिला आहे.

कल्याण तालुक्यातील अनेक आदिवासी पाडे आहेत. ज्या ठिकाणी आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाले तरी पण मुंबई पासून हाकेच्या अंतरावर राहणारा आदिवासी बांधवाना पाणी नाही. घर नाही. सुरुवातीपासून एक प्रकारे समाज वंचित आहे. बुधवारी सकाळी कल्याणमध्ये तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सचिव संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा काढला. कल्याणच्या सुभाष चंद्र बोस चौकातून घोषणाबाजी करीत या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चा दरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कल्याण तहसील कार्यालयात मोर्चेकरींनी ठिय्या मांडला. समाजाला काय त्रास सहन करावा लागतो याची व्यथा तहसीलदार जयराज देशमुख यांच्यासमोर मांडली.

यावेळी श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सचिव भोईर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनाही पत्र देणार आहोत. किती वाड्यांना रस्ते नाहीत. पिण्याचे पाणी नाही. किती लोकांना आधार कार्ड नाही. घरकुले नाहीत. याची गावाच्या नावासह यादी देणार. अधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण केल्या तर तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसल्याशिवाय श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सचिवसंघटना राहणार नाही असा इशारा दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण