शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मंजूर पाणी कोटा मिळणार नसेल तर नव्या बांधकामांच्या परवानग्या थांबविणार का ?

By मुरलीधर भवार | Updated: March 21, 2023 16:19 IST

विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

कल्याण-कल्याण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे. नागरीकांकडून एमआयडीसी कार्यालयावर मोर्चे काढले जातात या भीषण पाणी टंचाई प्रश्नाविषयी मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. लवकरच ही पाणी टंचाई दूर झाली पाहिजे. १०५ एमएलडी पाण्याचा कोटा मिळणार की नाही. तसेच नव्या होत असलेल्या बांधकाम पवानग्या थांबविणार का असा प्रश्न उपस्थित  केला असता त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी पाण्याचा १०५ एमएलडी पाण्याचा कोटा देण्याचे आदेश एमआयडीसीला दिले असल्याचे सांगितले. येणा:या काळात कल्याण ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर होणार होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

कल्याण ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसापासून पाणी टंचाईच्या विरोधात एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. ही पाण्याची समस्या आमदार  पाटील यांच्या मतदार संघातील आहे. या भागासाठी एमआयडीसीकडून १०५ एमएलडी पाण्याचा कोटा मंजूर आहे. मात्र हा मंजूर पाण्याचा कोटा या भागाला मिळत नाही. या भागात अनंतम्, लोढा, रुनवाल यांचे बडे गृहसंकुल प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातील जवळपास १ लाख २५ हजार फ्लॅट यंदा फ्लॅट खरेदी करणा:यांना वितरीत केले जाणार आहेत. त्यामुळे पाण्याची गरज जास्त आहे. मात्र मिळणारे पाणी कमी आहे. मंजूर १०५ एमएलडी पाण्याचा कोटा कल्याण ग्रामीण भागाला मिळणार आहे की नाही. हा मंजूर कोटा दिला जाणार नसले तर नव्याने होणा:या गृह प्रकल्पांची परवानगी थांबविणार आहात का  असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.

त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मनसे आमदार पाटील यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे. त्यांनी सांगितल्यानुसार या भागात नवे गृहप्रकल्प उभे राहत आहे. या भागासाठी मंजूर असलेला १०५ एमएलडी पाण्याच्या कोटय़ा पैकी ६५ एमएलडी पाणी सध्या पुरविले जाते आहे. उरलेला कोटा देखील मोजून दिला जाईल. ६५ ऐवजी ८५ एमआलडी पाणी देण्याचे एमआयडीसीने मान्य केले असले तरी एमआयडीने मंजूर कोटयानुसार १०५ एमएलडी पाणी देण्याचे नियोजन एमआयडीसीने करावे असे आदेश एमआयडीसीला दिलेले आहेत.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस