शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:37 IST

Kalyan : मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

कल्याणनवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत असताना या मागणीचा विचार राज्य सरकारकडून केला जात नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर, रायगड या परिसरात १० जून रोजी भू्मीपत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर आत्ता सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून रोजी आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी भूमीपूत्रांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजप नेते जगन्नाथ पाटील, खासदार कपिल पाटील, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणो , रिपाईचे अकुंश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्याच्या मुद्यावर ठाम आहे. आत्तार्पयत झालेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्याचे नाव दिले नाही. उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर वादाचा फटका तत्कालीन सरकारला बसला होता. दि. बांचे नाव देण्याचा लढा हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढय़ाचे स्वरुप धारण करु शकतो. आत्ता संयमाने घेतले जात असले तरी पुढे संयम ठेवला जाईल अशी आपेक्षा सरकारने आमच्याकडून ठेवू नये असा सूर या बैठकीतून व्यक्त केला गेला.

खासदार पाटील यांनी सांगितले की, आपला समाज एखादा विषय पकडतो आणि सोडन देतो. या आंदोलनात जो सहभागी होईल तोच खरा भूमीपूत्र आहे. ही भूमिका प्रत्येक भूमीपूत्रपर्यंत पोचविल्यास आंदोलनास व्यापक स्वरुप प्राप्त होऊ शकते. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यावेळी आमचा त्याला विरोध नव्हता. पण दि. बांच्या नावाला त्यांचा विरोध असण्याचे कारण नाही. सिडकोने पारित केलेल्या ठरावानंतर सिडको आली कूठून असा काही नेते मंडळी सवाल उपस्थित करीत असली तीर सिडकोला भूमीपूत्रांनी जागा दिली आहे म्हणून सिडको आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका मांडलेली नाही.त्यांची भूमिका स्पष्ट होताच त्याचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी होईल. त्यामुळे आंदोलन व्यापक होईल.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईkalyanकल्याण