शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:37 IST

Kalyan : मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

कल्याणनवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत असताना या मागणीचा विचार राज्य सरकारकडून केला जात नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर, रायगड या परिसरात १० जून रोजी भू्मीपत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर आत्ता सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून रोजी आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी भूमीपूत्रांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजप नेते जगन्नाथ पाटील, खासदार कपिल पाटील, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणो , रिपाईचे अकुंश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्याच्या मुद्यावर ठाम आहे. आत्तार्पयत झालेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्याचे नाव दिले नाही. उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर वादाचा फटका तत्कालीन सरकारला बसला होता. दि. बांचे नाव देण्याचा लढा हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढय़ाचे स्वरुप धारण करु शकतो. आत्ता संयमाने घेतले जात असले तरी पुढे संयम ठेवला जाईल अशी आपेक्षा सरकारने आमच्याकडून ठेवू नये असा सूर या बैठकीतून व्यक्त केला गेला.

खासदार पाटील यांनी सांगितले की, आपला समाज एखादा विषय पकडतो आणि सोडन देतो. या आंदोलनात जो सहभागी होईल तोच खरा भूमीपूत्र आहे. ही भूमिका प्रत्येक भूमीपूत्रपर्यंत पोचविल्यास आंदोलनास व्यापक स्वरुप प्राप्त होऊ शकते. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यावेळी आमचा त्याला विरोध नव्हता. पण दि. बांच्या नावाला त्यांचा विरोध असण्याचे कारण नाही. सिडकोने पारित केलेल्या ठरावानंतर सिडको आली कूठून असा काही नेते मंडळी सवाल उपस्थित करीत असली तीर सिडकोला भूमीपूत्रांनी जागा दिली आहे म्हणून सिडको आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका मांडलेली नाही.त्यांची भूमिका स्पष्ट होताच त्याचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी होईल. त्यामुळे आंदोलन व्यापक होईल.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईkalyanकल्याण