शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगिकारली, तर शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही - डॉ. भाऊसाहेब दांगडे  

By मुरलीधर भवार | Updated: September 23, 2022 15:30 IST

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शिक्षक, विद्यार्थी वर्ग यांनी स्वच्छतेविषयी शपथ घेतली.

कल्याण-नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगिकारली तर शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही, स्वच्छता ही एक सवय आहे, ती सवय प्रत्येक नागरिकाने लावून घेतली तर चळवळ निर्माण होईल आणि या चळवळीतूनच शहर स्वच्छ होईल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे केले. 

स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत इंडियन स्वच्छता लिग हा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ महापालिकेमार्फत साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने आज सकाळी महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या महापालिका अधिकारी कर्मचारी , शिक्षक वर्ग, विद्यार्थी, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्या भव्य रॅलीस  संबोधताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी महापालिकेच्या या उपक्रमाचे टिम कॅप्टन ब्रँड अँम्बॅसिडर डॉ. प्रशांत पाटील, आयएमए चे डॉ. अश्विन कक्कर, घनकचरा विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, उप आयुक्त विनय कुलकर्णी, इतर अधिकारी /कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील महाविद्यालये व शाळांतील सुमारे ८०० ते ८५० विद्यार्थी उपस्थित होते. यासमयी उपस्थित अधिकारी /कर्मचारी व शिक्षक, विद्यार्थी वर्ग यांनी स्वच्छतेविषयी शपथ घेतली.

महापालिकेतून निघालेली ही भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, सहजानंद चौक मार्गे दुर्गाडी किल्ला ते गणेश घाटापर्यंत काढण्यात आली. याठिकाणी उपस्थितांमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच गणेश घाट येथे उप आयुक्त अतुल पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गास ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक कचरा, सॅनीटरी कचरा याचे विलगीकरण कसे करावे, त्यामुळे शहर स्वच्छ होण्यास कशी मदत होईल याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले आणि तद्नंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील स्वंयस्फुर्तीने कचरा विलगीकरण, स्वच्छतेचे महत्व याविषयी आपले मत मांडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ घराघरात पोहचेल याचे प्रत्यंतर आले.

टॅग्स :kalyanकल्याण