शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगिकारली, तर शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही - डॉ. भाऊसाहेब दांगडे  

By मुरलीधर भवार | Updated: September 23, 2022 15:30 IST

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शिक्षक, विद्यार्थी वर्ग यांनी स्वच्छतेविषयी शपथ घेतली.

कल्याण-नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगिकारली तर शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही, स्वच्छता ही एक सवय आहे, ती सवय प्रत्येक नागरिकाने लावून घेतली तर चळवळ निर्माण होईल आणि या चळवळीतूनच शहर स्वच्छ होईल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे केले. 

स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत इंडियन स्वच्छता लिग हा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ महापालिकेमार्फत साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने आज सकाळी महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या महापालिका अधिकारी कर्मचारी , शिक्षक वर्ग, विद्यार्थी, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्या भव्य रॅलीस  संबोधताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी महापालिकेच्या या उपक्रमाचे टिम कॅप्टन ब्रँड अँम्बॅसिडर डॉ. प्रशांत पाटील, आयएमए चे डॉ. अश्विन कक्कर, घनकचरा विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, उप आयुक्त विनय कुलकर्णी, इतर अधिकारी /कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील महाविद्यालये व शाळांतील सुमारे ८०० ते ८५० विद्यार्थी उपस्थित होते. यासमयी उपस्थित अधिकारी /कर्मचारी व शिक्षक, विद्यार्थी वर्ग यांनी स्वच्छतेविषयी शपथ घेतली.

महापालिकेतून निघालेली ही भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, सहजानंद चौक मार्गे दुर्गाडी किल्ला ते गणेश घाटापर्यंत काढण्यात आली. याठिकाणी उपस्थितांमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच गणेश घाट येथे उप आयुक्त अतुल पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गास ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक कचरा, सॅनीटरी कचरा याचे विलगीकरण कसे करावे, त्यामुळे शहर स्वच्छ होण्यास कशी मदत होईल याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले आणि तद्नंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील स्वंयस्फुर्तीने कचरा विलगीकरण, स्वच्छतेचे महत्व याविषयी आपले मत मांडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ घराघरात पोहचेल याचे प्रत्यंतर आले.

टॅग्स :kalyanकल्याण