शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांना लहापणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवा - अभिनेत्री अनिता दाते

By मुरलीधर भवार | Updated: December 14, 2022 20:32 IST

आगरी युथ फोरम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सवात ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील कलाकरांनी उपस्थिती लावली होती.

डोंबिवली: समाजात स्त्रियांना सन्मानाने वागावले जावे हा बदल घडण्यासाठी अजून खूप वेळ जाणार आहे. समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांची जडणघडण करतानाच त्यांना स्त्रियांना सन्मानाने वागावले पाहिजे हे शिकविण्याची गरज आहे. समाजात बदल घडेल तेव्हा मालिकांमधून सोशिक स्त्री दाखविणे बंद होईल, असे मत अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी व्यक्त केले.

आगरी युथ फोरम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सवात ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील कलाकरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अनिता दाते-केळकर प्रेक्षकांशी संवाद साधताना बोलत होत्या. संत सावळाराम महाराज क्रिडासंकुलात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकलाकार साईशा भोईर या देखील उपस्थित होत्या.

अनिता म्हणाल्या, समाजात स्त्रियांना सन्मानाने वागावावे हे सांगावे लागते. वास्ताविक ही गोष्ट स्वाभाविकपणो घडली पाहिजे. पण वर्षानुवर्ष स्त्रियांनीच ही कामे करावी ही जबाबदारी त्यांच्यावर लादली गेली आहे. स्त्रिया यातून भरडल्या जात आहेत. एकीकडे स्त्रियांना देवीचा रूप मानले जाते. दुसरीकडे तिला कमी लेखले जाते असा दुटप्पी पध्दतीचा समाज आहे. समाजात बदल अपेक्षित असेल तर स्त्रियांनी आपल्या मुलाला अधिक वेगळ्य़ा पध्दतीने घडविले पाहिजे. स्त्रियांचा सन्मान करायला शिकविले पाहिजे. मुला-मुलींना समान वागणूक दिली पाहिजे. त्यामुळे थोडाफार बदल घडेल. परिस्थिती बदलली आहे असे आपण म्हणतो पण घराघरात अजून ही परिस्थिती तशीच आहे. समाज बदलायला अजून ही खूप वेळ लागणार आहे. समाज बदलेल तेव्हाच मालिकेतून सोशिक स्त्री दाखविणो बंद होईल.  मालिकामधील स्त्री अजून ही लढत आहे. आणि इतर स्त्रियांना लढण्यासाठी प्रेरणा देत आहे. समाजात अनेक स्त्रिया अश्या आहेत त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी काहीतरी काम करायचे आहे. पण तिला घरातून साथ मिळत नाही. मालिका पाहून प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले तर समाजात बदल नक्कीच घडतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीFishermanमच्छीमारAnita Dateअनिता दाते