शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आयसीयू बेड हवाय, आधी दीड लाख रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:42 IST

खासगी रुग्णालयाकडून मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एकीकडे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केडीएमसीसह खासगी रुग्णालयांत रुग्णांना बेड मिळत नसताना आयसीयू बेड हवा असल्यास दीड लाख रुपये जमा करावे लागतील, अशी मागणी कल्याण-शीळ रस्त्यावरील साई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून एका अत्यावस्थ अवस्थेतील कोरोना रुग्णाच्या निकटवर्तीयांकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केडीएमटीचे माजी सभापती राजेश कदम यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरात राहणाऱ्या एका ४१ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली. सर्दी, ताप असल्याने संबंधित रुग्णाला सरकारी आणि खासगी रूग्णालयांनी घरीच उपचार घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, रुग्णाची तब्येत शनिवारी रात्री अचानक ढासळली आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अत्यवस्थ रुग्णाला घेऊन त्याच्या पत्नीने डोंबिवली परिसरात रुग्णालयात आयसीयू बेड कुठे मिळतोय का याचा शोध सुरू केला; परंतु त्यांना कुठेच बेड उपलब्ध होत नव्हता. शेवटी रुग्णाच्या निकटवर्तीयांनी कल्याण- शीळ रोडवरील काटई येथील साई या खासगी कोविड रुग्णालयात  बेडबाबत विचारणा केली असता तेथे आयसीयू बेड उपलब्ध असल्याची माहिती मिळाली; परंतु साई रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे दीड लाख रुपये आगाऊ रक्कम भरावी लागेल, अशी मागणी केली.  मात्र, रात्रीच्या वेळेला एवढ्या मोठया रकमेची तरतूद होऊ शकत नाही, आम्ही आता ५० हजार रुपये भरतो व उद्या दुपारी एकपर्यंत उर्वरित एक लाख रुपये जमा करतो, असे सांगण्यात आले. परंतु दीड लाख रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला दाखल करून घेतले जाणार नाही, असे सांगण्यात आल्याने अखेरीस आम्ही गंभीर अवस्थेत असलेल्या पतीला मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पत्नीने दिली.  दरम्यान, याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे याबाबत रुग्णालयाची बाजू समोर येऊ शकली नाही.कारवाईची मागणी साई रुग्णालयात बेड उपलब्ध असतानाही निव्वळ दीड लाखांसाठी रुग्णालय व्यवस्थापनाने एका अत्यवस्थ रुग्णाला बेड उपलब्ध करून दिला नाही. रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि पैशांचा बाजार मांडणाऱ्या अशा रुग्णालयावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे, अशी तक्रार राजेश कदम यांनी पालिकेकडे केली आहे