शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अजून किती काळ कामगारांचे जळालेले तुकडे गोळा करणार? कामगार भेदरले, नागरिक संतापले

By अनिकेत घमंडी | Updated: June 13, 2024 13:53 IST

Dombivali MIDC News: जगार मिळण्याच्या आमिषाने आम्ही इथे आलो, पण इथे रोजच मृत्यूची टांगती तलवार कायम आहे, शिक्षण कमी, घरच्या जबाबदाऱ्या आणि सतत स्फोट, आगीशी खेळ अशा वातावरणामुळे खूप भीती वाटते, अशा शब्दांत इंडो अमाईन कंपनीतील घाबरलेल्या कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - रोजगार मिळण्याच्या आमिषाने आम्ही इथे आलो, पण इथे रोजच मृत्यूची टांगती तलवार कायम आहे, शिक्षण कमी, घरच्या जबाबदाऱ्या आणि सतत स्फोट, आगीशी खेळ अशा वातावरणामुळे खूप भीती वाटते, अशा शब्दांत इंडो अमाईन कंपनीतील घाबरलेल्या कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एमआयडीसीतील कंपन्यांना किती केमिकल साठा करण्याची परवानगी आहे? त्यांनी किती साठा करून ठेवलाय यावर कुणाचेच नियंत्रण नाही का, असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.

वीस दिवसांपूर्वी अंबर(अमुदान) कंपनीत स्फोट झाला. आता इंडो अमाईनमध्ये आग लागली हे आणखी किती दिवस चालणार? यावर काही तोडगा आहे की नाही? सगळा अनागोंदी कारभार असाच सुरू राहणार? हे कारखानदार पैसेवाले आहेत त्यामुळे त्यांना लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवाल जमलेल्या नागरिकांनी केला. अमुदान स्फोटात ज्यांच्या घरांचे खूप नुकसान झाले, त्यापैकी काही महिलांना बुधवारी रडू कोसळले.

पुन्हा स्थिती जैसे थेराजकीय पक्ष, शासन काही करत नाही, फक्त अपघात झाला की येतात आणि घोषणा करून जातात, पुन्हा स्थिती जैसे थे. शासकीय यंत्रणाही एकामागून एक येतात. सामान्यांच्या जीवाचे कोणाला काही पडलेले नाही, ही शोकांतिका आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.नोकरी करणे झाले कठीण     कामगार रोजीरोटीसाठी येतात आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. वर्षानुवर्षे असेच सुरू आहे. आगीचे लोळ, धूर दिसल्याने इंडो अमाईनमधील कामगार निदान बाहेर पळाले.      बॉयलर किंवा रिॲक्टरचा स्फोट झाला तर आतल्या आत किती गेले त्याचा पत्ता लागत नाही. नंतर जळलेले मांसाचे तुकडे गोळा केले जातात, अशी भावना एका कामगाराने व्यक्त केली. येथे नोकरी करणे कठीण झाल्याची खंत त्याने व्यक्त केली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी