शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

KDMC तून गावे वगळण्याची सुनावणी पुढे ढकलली

By मुरलीधर भवार | Updated: May 15, 2023 23:07 IST

महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा प्रस्ताव

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी हाेती. मात्र या प्रकरणी राज्य सरकार आणि महापालिकेने मुदतवाढ मागितल्याने आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

२७ गावे २०१५ साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. ही गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याची मागणी असताना गावे महापालिकेत का समाविष्ट केली असा सवाल उपस्थित केला. २७ गावे महापालिकेतून वगळण्यात यावी अशी मागणी करीत तत्कालीन राज्य सरकारच्या निर्णयास सर्व पक्षीय संघर्ष समितीने जाेरदार हरकत घेतली. त्यामुळे ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी या मागणीवर शिवसेना भाजप सरकारने निर्णय घेतला नाही. ही बाब झुलवत ठेवली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकारने २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याची अधिसूचना काढली. तसेच १८ गावे वगळण्यात आली त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठीही अधिसूचना काढली. या दोन्ही अधिसूचनांना उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने न्यायालयाने स्थगिती आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी क’व्हेट दाखल केले. त्यावर न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेस जाब विचारला होता. गेल्या सहा महिन्यापासून या प्रकरणात मुदत वाढवून घेतली जात आहे. आज या प्रकरणावर सुनावणी होती. मात्र राज्य सरकारने या प्रकरणी २ आवठवड्याची तर महापालिकेने ४ आठवड्याची मुदत वाढ मागितली आहे. ही मुदतवाढ मागितल्याने आज ची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर पुढील सुनावणीची तारीख मिळू शकते अशी माहिती याचिकाकर्ते पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात १८ गावे वगळणे आणि त्यांची स्वतंत्र नगरपालिका करणे या दोन्ही अधिसूचनाना रद्द करुन वगळलेली गावे महापालिकेत समाविष्ट असावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका