शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

KDMC तून गावे वगळण्याची सुनावणी पुढे ढकलली

By मुरलीधर भवार | Updated: May 15, 2023 23:07 IST

महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा प्रस्ताव

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी हाेती. मात्र या प्रकरणी राज्य सरकार आणि महापालिकेने मुदतवाढ मागितल्याने आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

२७ गावे २०१५ साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. ही गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याची मागणी असताना गावे महापालिकेत का समाविष्ट केली असा सवाल उपस्थित केला. २७ गावे महापालिकेतून वगळण्यात यावी अशी मागणी करीत तत्कालीन राज्य सरकारच्या निर्णयास सर्व पक्षीय संघर्ष समितीने जाेरदार हरकत घेतली. त्यामुळे ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी या मागणीवर शिवसेना भाजप सरकारने निर्णय घेतला नाही. ही बाब झुलवत ठेवली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकारने २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याची अधिसूचना काढली. तसेच १८ गावे वगळण्यात आली त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठीही अधिसूचना काढली. या दोन्ही अधिसूचनांना उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने न्यायालयाने स्थगिती आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी क’व्हेट दाखल केले. त्यावर न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेस जाब विचारला होता. गेल्या सहा महिन्यापासून या प्रकरणात मुदत वाढवून घेतली जात आहे. आज या प्रकरणावर सुनावणी होती. मात्र राज्य सरकारने या प्रकरणी २ आवठवड्याची तर महापालिकेने ४ आठवड्याची मुदत वाढ मागितली आहे. ही मुदतवाढ मागितल्याने आज ची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर पुढील सुनावणीची तारीख मिळू शकते अशी माहिती याचिकाकर्ते पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात १८ गावे वगळणे आणि त्यांची स्वतंत्र नगरपालिका करणे या दोन्ही अधिसूचनाना रद्द करुन वगळलेली गावे महापालिकेत समाविष्ट असावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका