शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 07:44 IST

Shrikant Shinde : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण डॉक्टर आर्मी या कार्यक्रमाला डॉ. शिंदे उपस्थित होते.

कल्याण : केडीएमसीतून १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निकाल दिला आहे. या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार जाऊ शकते, असे मत कल्याणचे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मांडले आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण डॉक्टर आर्मी या कार्यक्रमाला डॉ. शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांना १८ गावांच्या निकालासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी उपरोक्त मत मांडले. कल्याण-डोंबिवलीतील १८ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र काही याचिकाकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय व गावे वगळण्याची प्रक्रिया रद्द ठरविली. शिंदे यांना याविषयीची भूमिका विचारली असता, त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात काही होऊ शकते का, याचा विचार सरकारी स्तरावर केला जाऊ शकतो. 

सर्वपक्षीय संघर्ष समितीही आक्रमकसर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक रविवारी मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिरात पार पडली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, वंडार पाटील, गगाजन मांगरुळकर, दत्ता वझे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीपश्चात समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी समितीने लावून धरली होती. विद्यमान सरकारने २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली असताना, न्यायालयाने सरकारच्या प्रक्रियेस रद्दबातल ठरविले आहे. वास्तविक, १९८३ साली गावे महापालिकेत घेतली, तेव्हा आणि ही गावे २००२ साली वगळली तेव्हादेखील पालिकेने कोणताही ठराव केला नव्हता. ही गावे पुन्हा २०१५ साली महापालिकेत समाविष्ट केली गेली तेव्हाही ठराव केला नव्हता. मग न्यायालयाने आताच हा मुद्दा ग्राह्य धरुन त्याआधारे निकाल दिला.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याण