शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 07:44 IST

Shrikant Shinde : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण डॉक्टर आर्मी या कार्यक्रमाला डॉ. शिंदे उपस्थित होते.

कल्याण : केडीएमसीतून १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निकाल दिला आहे. या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार जाऊ शकते, असे मत कल्याणचे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मांडले आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण डॉक्टर आर्मी या कार्यक्रमाला डॉ. शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांना १८ गावांच्या निकालासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी उपरोक्त मत मांडले. कल्याण-डोंबिवलीतील १८ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र काही याचिकाकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय व गावे वगळण्याची प्रक्रिया रद्द ठरविली. शिंदे यांना याविषयीची भूमिका विचारली असता, त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात काही होऊ शकते का, याचा विचार सरकारी स्तरावर केला जाऊ शकतो. 

सर्वपक्षीय संघर्ष समितीही आक्रमकसर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक रविवारी मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिरात पार पडली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, वंडार पाटील, गगाजन मांगरुळकर, दत्ता वझे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीपश्चात समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी समितीने लावून धरली होती. विद्यमान सरकारने २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली असताना, न्यायालयाने सरकारच्या प्रक्रियेस रद्दबातल ठरविले आहे. वास्तविक, १९८३ साली गावे महापालिकेत घेतली, तेव्हा आणि ही गावे २००२ साली वगळली तेव्हादेखील पालिकेने कोणताही ठराव केला नव्हता. ही गावे पुन्हा २०१५ साली महापालिकेत समाविष्ट केली गेली तेव्हाही ठराव केला नव्हता. मग न्यायालयाने आताच हा मुद्दा ग्राह्य धरुन त्याआधारे निकाल दिला.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याण