शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कल्याणात एकत्र आल्या चार पिढ्या, आजी-आजोबा दिवसाच्या निमित्ताने बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेचा उपक्रम

By प्रशांत माने | Updated: October 8, 2023 10:42 IST

बदलत्या काळात लुप्त होणाऱ्या ‘एकत्र कुटुंब’ पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणारा कार्यक्रम शनिवारी कल्याणात संपन्न झाला.

कल्याण: बदलत्या काळात लुप्त होणाऱ्या ‘एकत्र कुटुंब’ पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणारा कार्यक्रम शनिवारी कल्याणात संपन्न झाला. निमित्त होते ते आजी आजोबा दिवसाचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बालक मंदिर संस्था कल्याण, प्राथमिक शाळेने आजी -आजोबा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पणजी, आजी, आई आणि मुलगी अशा चार पिढ्या सहभागी झाल्या होत्या.

'एकत्र कुटुंब पद्धत' ही भारतीय संस्कृतीची ओळख आणि पाया मानला जातो. यात आपल्याकडे आजी आजोबा आणि नातवंडांचे नाते म्हणजे दुधावरची साय असे वर्णन करण्यात आले आहे. पण काळाच्या ओघामध्ये एकत्र कुटुंब पद्धत लुप्त होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कार्यक्रमात शाळेतील पालकांच्या चार पिढ्या एकत्र आल्या होत्या. लहान मुलांमध्ये मुल होऊन खेळणारे, त्यांची काळजी घेणारे, नातवंडांच्या स्पर्शाची भाषा समजणा-या आजी आजोबांसाठी काहीतरी खास करावे म्हणून विविध कार्यक्रम घेतले गेले. या कार्यक्रमासाठी मधुकर फडके आणि मंजिरी फडके हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यात गीतगायन, कीर्तन, गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, तबला वादन, कथाकथन, सामुहिक नृत्य, भजन, गवळण अशा कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी वामन चिराटे यांनी सादर केलेल्या किर्तनात सर्वजण तल्लीन झाले होते. सर्व आजी -आजोबांनी या उपक्रमात भाग घेत आनंद लुटल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा मोरे यांनी तर पाहूण्यांची ओळख भालचंद्र घाटे यांनी करून दिली. मुख्याध्यापिका कल्पना पवार यांनी प्रास्ताविक, दिपाली पाटील यांनी आभार मानले आणि रेखा महिंद्रकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मुख्याध्यापिका पवार आणि संस्थेचे पदाधिकारी अनिल कुलकर्णी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.