शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील फूल मार्केट जमीनदोस्त; कारवाईला विक्रेत्यांचा तीव्र विरोध

By मुरलीधर भवार | Updated: September 22, 2022 15:33 IST

या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूल मार्केटमधील शेड तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानुसार, आज पोलिस बंदोबस्तात बाजार समिती प्रशासनाने शेड पाडण्याची कारवाई केली. या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

फूल मार्केटमध्ये ९०० शेड आहेत. त्यापैकी १९६ शेड या बाजार समितीकडे होत्या. तर १७० शेड या विघ्नहर संस्थेला दिल्या होत्या. उर्वरीत शेडचे भाडे महापालिका वसूल करते. फूल मार्केटचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या पूनर्विकासाला काही फूल विक्रेत्यांचा विरोध असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

या प्रकरणी न्यायालयाने शेड पाडण्याचे आदेश समितीला दिले होते. सात दिवसात ही कारवाई करा असे आदेशित केले होते.१५ सप्टेंबर रोजी हे आदेश प्राप्त झाल्यावर प्रशासनाने विक्रेत्यांना नोटिसा बजावून आज कारवाई केली जाईल असे सूचित केले होते. आज कारवाईकरीता पथक पोहचले असता त्याला फूल विक्रेत्यांनी विरोध केला. काही महिला फूल विक्रेत्यांनी जेसीबीसमोर उभे राहून विरोध केला. हा विरोध पाहता बाजार समिती प्रशासन कारवाई विषयी ठाम असल्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे फूल मार्केट पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेड पाडल्यावर विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तर शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांनी सांगितले की, बाजार समितीने केलेल्या कारवाईचा निषेध आहे. ज्या जागेवर फूल विक्रेत्यांचे शेड होते. ती जागा केडीएमसीला दिली आहे. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यात धोकादायक शेड पाडण्याचे म्हटले आहे. मात्र महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी २०२० साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार शेड धोकादायक नसताना सत्ता आणि पैशाच्या जोरावरही कारवाई केली जात आहे.

फूल विक्रेते सागर मांडे यांनी सांगितले की, आम्हाला पर्यायी जागा न देता ही कारवाई करण्यात आली आहे. फूल विक्रेते आणि शेतकरी यांच्या पोटावर पाय दिला आहे. हे पाप कुठे फेडणार असा सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी आहेत असे सांगतात. मग हा अन्याय कशासाठी. आत्ता धंद्याचा सिझन आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी सण तोंडावर असताना ही कारवाई अन्यायकारक आहे. आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण