शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील फूल मार्केट जमीनदोस्त; कारवाईला विक्रेत्यांचा तीव्र विरोध

By मुरलीधर भवार | Updated: September 22, 2022 15:33 IST

या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूल मार्केटमधील शेड तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानुसार, आज पोलिस बंदोबस्तात बाजार समिती प्रशासनाने शेड पाडण्याची कारवाई केली. या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

फूल मार्केटमध्ये ९०० शेड आहेत. त्यापैकी १९६ शेड या बाजार समितीकडे होत्या. तर १७० शेड या विघ्नहर संस्थेला दिल्या होत्या. उर्वरीत शेडचे भाडे महापालिका वसूल करते. फूल मार्केटचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या पूनर्विकासाला काही फूल विक्रेत्यांचा विरोध असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

या प्रकरणी न्यायालयाने शेड पाडण्याचे आदेश समितीला दिले होते. सात दिवसात ही कारवाई करा असे आदेशित केले होते.१५ सप्टेंबर रोजी हे आदेश प्राप्त झाल्यावर प्रशासनाने विक्रेत्यांना नोटिसा बजावून आज कारवाई केली जाईल असे सूचित केले होते. आज कारवाईकरीता पथक पोहचले असता त्याला फूल विक्रेत्यांनी विरोध केला. काही महिला फूल विक्रेत्यांनी जेसीबीसमोर उभे राहून विरोध केला. हा विरोध पाहता बाजार समिती प्रशासन कारवाई विषयी ठाम असल्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे फूल मार्केट पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेड पाडल्यावर विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तर शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांनी सांगितले की, बाजार समितीने केलेल्या कारवाईचा निषेध आहे. ज्या जागेवर फूल विक्रेत्यांचे शेड होते. ती जागा केडीएमसीला दिली आहे. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यात धोकादायक शेड पाडण्याचे म्हटले आहे. मात्र महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी २०२० साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार शेड धोकादायक नसताना सत्ता आणि पैशाच्या जोरावरही कारवाई केली जात आहे.

फूल विक्रेते सागर मांडे यांनी सांगितले की, आम्हाला पर्यायी जागा न देता ही कारवाई करण्यात आली आहे. फूल विक्रेते आणि शेतकरी यांच्या पोटावर पाय दिला आहे. हे पाप कुठे फेडणार असा सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी आहेत असे सांगतात. मग हा अन्याय कशासाठी. आत्ता धंद्याचा सिझन आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी सण तोंडावर असताना ही कारवाई अन्यायकारक आहे. आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण