शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

मृत्यूपेक्षाही बेघर होण्याची भीती अधिक; धोकादायक इमारती करत नाहीत स्ट्रक्चरल ऑडिट 

By मुरलीधर भवार | Updated: May 21, 2025 15:07 IST

कल्याण : कल्याण -डोंबिवली महापालिका हद्दीत ५१३ धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतीमधील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची कुठलीही व्यवस्था ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ५१३ धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतीमधील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची कुठलीही व्यवस्था नाही हेच दारुण वास्तव कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा येथील सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या दुर्घटनेतून अधोरेखित झाले. पालिकेने एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिधोकादायक इमारतींची संख्या १६९ आहे, तर धोकादायक इमारतींची संख्या २९३ आहे. अतिधोकादायक इमारती महापालिकेकडून पाडण्यात येतात. मात्र त्यामधील घरे लोकांनी सोडली नाहीत तर त्या पाडण्यात अडचणी येतात. धोकादायक इमारतींना पालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडून नोटिसा पाठविल्या जातात. या इमारती पावसाळ्यापूर्वी रहिवासमुक्त कराव्यात अथवा स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे नाेटीसमध्ये सूचित असते. दुर्घटनाग्रस्त सप्तशृंगी इमारतीलाही पालिकेने धोकादायक इमारतीची नोटीस बजावली होती व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आला तर जायचे कुठे,  असा प्रश्न रहिवाशांना भेडसावतो. घर सोडायला लागण्याच्या भीतीपोटी स्ट्रक्चरल ऑडिट टाळण्याकडे नागरिकांचा कल असतो. धोकादायक इमारतीचा पुनर्विकासासाठी पालिकेच्या नगररचना खात्याकडून परवानगी दिली जाते. मात्र जागामालक, भाडेकरू आणि बिल्डर यांच्यात एकमत होत नाही. त्यामुळे पुनर्विकासाच्या प्रस्तावांना प्रतिसाद मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात धाेकादायक इमारती पाडण्याच्या कामाला वेग आला होता. त्यामुळे अशा इमारतींची संख्या कमी झाली होती. 

क्लस्टरचे घोंगडे भिजत २०१५ मध्ये ठाकुर्लीतील ‘मातृछाया सदन’ ही इमारत पडली. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता क्लस्टर योजना राबविली जाईल, असे म्हटले होते. पालिकेने क्लस्टर योजनेचा प्लान तयार केला. क्लस्टर योजना ४१ ठिकाणी राबविली जाणार आहे. त्यापैकी कल्याण कोळसेवाडी आणि डोंबिवली आयरे दत्तनगर परिसरात प्रथम राबविली जाणार आहे. त्यासाठी १० कोटी मोजून बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी कंत्राटदार नेमला. कल्याण-कोळसेवाडीचे सर्वेक्षण ९० टक्के झाले. मात्र डोंबिवली आयरे दत्तनगर परिसरातील सर्वेक्षणाचे काम ४० टक्के झाले. सर्वेक्षणाचे काम थांबल्याने कंपनीचा ठेका  रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. 

पालिका काय करणार?डोंबिवलीतील आयरे परिसरात ‘आदिनारायण’ ही धोकादायक इमारत २०२३ मध्ये पडल्याने दोन जणांचा मृ्त्यू झाला. त्याच घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी कल्याण पूर्वेत घडली.  यामध्ये सहा जणांचा जीव गेला. आता महापालिका काय पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका