शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

युरोपची युरोबस आत्ता कल्याण डोंबिवलीत धावणार! पहिल्या टप्प्यात १०७ बसेस मिळणार!!

By मुरलीधर भवार | Updated: October 11, 2022 19:34 IST

युरोपच्या युरोबसेस दिल्या जाणार असून या बसेस उपलब्ध करुन देण्याचे कंत्राट कॉसिस मोबिलिटी आणि बुथेलो कंपनीला दिले गेले आहे. नोव्हेंबर अखेर १२ बसेस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होती.

कल्याण : पंधराव्या वित्त आयोगाच्या एन कॅप फंडिंगमधून राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. त्यापैकी ८० टक्के निधी हा बसेसवर खर्च करणे बंधनकारक आहे. या निधीतून वेटलिज तत्वावर दोन टप्प्यात एकूण २०७ बसेस महापालिकेच्या परिवहन उपक्रमास उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १०७ बसेस उपलब्ध होती. दुसऱ्या टप्प्यात १०० बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. 

युरोपच्या युरोबसेस दिल्या जाणार असून या बसेस उपलब्ध करुन देण्याचे कंत्राट कॉसिस मोबिलिटी आणि बुथेलो कंपनीला दिले गेले आहे. नोव्हेंबर अखेर १२ बसेस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होती. कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर आत्ता युरो बसेस धावणार आहेत. दिवाळी पूर्वीच केडीएमटीच्या प्रवाशांना ही गोड बातमी देऊन एक प्रकारे दिवाळी भेटच दिली गेली आहे. महापालिकेची केडीएमटी ही आर्थिक दृष्ट्या कमकवूत आहे. त्यामुळे अनेक मार्गावर सेवा देण्याचा मानस असूनही चांगल्या प्रकारच्या सेवा देणो शक्य होत नाही. 

केडीएमटीच्या ताफ्यात सध्या १४१ बसेस आहेत. त्यांचे आयुर्मान हे सात वर्षाचे आहे. आणखीन तीन वर्षाने त्यांची क्षमता संपुष्टात येणार आहे. १४१ बसेपैकी केवळ १०० बसेसच रस्त्यावर धावत आहे. उर्वरीत ४१ बसेस या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यशाळेत आहेत. महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला आहे. या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रवाशांना देखील चांगल्या बसेस उपलब्ध करुन देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहिला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून २०७ बसेस वेट लिज तत्वावर चालविल्या जाणार आहे. या बसेस पुरविण्याचे कंत्राट कॉसिस मोबिलीटी या कंपनीला दिले गेले आहे. 

सक्षम प्राधिकरणाने संबंधित कंत्रट कंपनीला स्वीकृती पत्र दिले आहे. पहिल्या टप्प्यात कॉसिस मोबिलीटी १०७ बसेस पुरविणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बुथेला कंपनीला १०० बसेस पुरविण्याची जबाबदारी दिली गेली आहे. या बसेस कंपनीकडून चालविल्या जाणार आहे. प्रति किलोमीटर मागे संबंधित कंत्राटदार कंपनीला खर्च दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना युरोबसमधून प्रवास करता येणार आहे. प्रदूषण मुक्त आणि आरामदायी प्रवास हे केडीएमटीने लक्ष्य ठेवले आहे. २०७ बसेस ताफ्यात दोन टप्प्यात दाखल झाल्यावर प्रवाशांना चांगल्या आरामदायी बसेमधून प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिल्याने केडीएमसी सक्षम होणार आहे असा विश्वास केडीएमटी व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त करण्यात आला. 

टॅग्स :kalyanकल्याण