शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

युरोपची युरोबस आत्ता कल्याण डोंबिवलीत धावणार! पहिल्या टप्प्यात १०७ बसेस मिळणार!!

By मुरलीधर भवार | Updated: October 11, 2022 19:34 IST

युरोपच्या युरोबसेस दिल्या जाणार असून या बसेस उपलब्ध करुन देण्याचे कंत्राट कॉसिस मोबिलिटी आणि बुथेलो कंपनीला दिले गेले आहे. नोव्हेंबर अखेर १२ बसेस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होती.

कल्याण : पंधराव्या वित्त आयोगाच्या एन कॅप फंडिंगमधून राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. त्यापैकी ८० टक्के निधी हा बसेसवर खर्च करणे बंधनकारक आहे. या निधीतून वेटलिज तत्वावर दोन टप्प्यात एकूण २०७ बसेस महापालिकेच्या परिवहन उपक्रमास उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १०७ बसेस उपलब्ध होती. दुसऱ्या टप्प्यात १०० बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. 

युरोपच्या युरोबसेस दिल्या जाणार असून या बसेस उपलब्ध करुन देण्याचे कंत्राट कॉसिस मोबिलिटी आणि बुथेलो कंपनीला दिले गेले आहे. नोव्हेंबर अखेर १२ बसेस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होती. कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर आत्ता युरो बसेस धावणार आहेत. दिवाळी पूर्वीच केडीएमटीच्या प्रवाशांना ही गोड बातमी देऊन एक प्रकारे दिवाळी भेटच दिली गेली आहे. महापालिकेची केडीएमटी ही आर्थिक दृष्ट्या कमकवूत आहे. त्यामुळे अनेक मार्गावर सेवा देण्याचा मानस असूनही चांगल्या प्रकारच्या सेवा देणो शक्य होत नाही. 

केडीएमटीच्या ताफ्यात सध्या १४१ बसेस आहेत. त्यांचे आयुर्मान हे सात वर्षाचे आहे. आणखीन तीन वर्षाने त्यांची क्षमता संपुष्टात येणार आहे. १४१ बसेपैकी केवळ १०० बसेसच रस्त्यावर धावत आहे. उर्वरीत ४१ बसेस या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यशाळेत आहेत. महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला आहे. या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रवाशांना देखील चांगल्या बसेस उपलब्ध करुन देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहिला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून २०७ बसेस वेट लिज तत्वावर चालविल्या जाणार आहे. या बसेस पुरविण्याचे कंत्राट कॉसिस मोबिलीटी या कंपनीला दिले गेले आहे. 

सक्षम प्राधिकरणाने संबंधित कंत्रट कंपनीला स्वीकृती पत्र दिले आहे. पहिल्या टप्प्यात कॉसिस मोबिलीटी १०७ बसेस पुरविणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बुथेला कंपनीला १०० बसेस पुरविण्याची जबाबदारी दिली गेली आहे. या बसेस कंपनीकडून चालविल्या जाणार आहे. प्रति किलोमीटर मागे संबंधित कंत्राटदार कंपनीला खर्च दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना युरोबसमधून प्रवास करता येणार आहे. प्रदूषण मुक्त आणि आरामदायी प्रवास हे केडीएमटीने लक्ष्य ठेवले आहे. २०७ बसेस ताफ्यात दोन टप्प्यात दाखल झाल्यावर प्रवाशांना चांगल्या आरामदायी बसेमधून प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिल्याने केडीएमसी सक्षम होणार आहे असा विश्वास केडीएमटी व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त करण्यात आला. 

टॅग्स :kalyanकल्याण