शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शहरातील रस्त्यावर धूळ, खड्डे आणि अस्वच्छता; सामाजिक संस्थांनी केला निषेध

By मुरलीधर भवार | Updated: October 25, 2023 16:17 IST

शालेय विद्यार्थ्यांसह सामाजिक संस्थांची केडीएमसी प्रभाग कार्यालयावर धडक

कल्याण  - शहरातील रस्त्यावर धूळ आहे. खड्डे बुजविले गेले नाही. तसेच शहरात कचरा उचलला जात नसल्याने अस्वच्छता आहे. या समस्या दूर करण्याकडे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. या समस्यांनी त्रस्त असेलल्या सेक्रेट हार्ट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करीत प्रभाग कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी शाळेच्या या आंदोलनास सामाजिक संस्थांनीही पाठिंबा देत सहभाग घेतला.

सेक्रेट हार्ट हायस्कूलचे प्रमुख अ’ल्बीन अँथोनी यांनी सांगितले की, कल्याण खडकपाडा परिसर हा सगळ्यात जास्त प्रदूषित ठिकाण आहे. २०२२ साली प्रदूषण अहवालात ते नमूद करण्यात आले आहे. ढाका, रंगून, कराची पेक्षा कल्याण डाेंबिवलीची स्थिती खराब आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. मात्र रस्त्यावरची धूळ दूर काेण करणार. खड्डे कोण भरणार याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. महापालिका अधिकारी वर्गास वारंवार पत्र व्यवहार केला जातो. त्यांच्याकडून हद्दीचा प्रश्न उपस्थित केला जातो. नागरीकांना श्वसनाचे अनेक आजार होत आहेत. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अधिकाऱ््यांच्या निष्काळजीपणाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण आयुक्तांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही.

या आंदोलनास जागरुक नागरीक फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी सक्रिय पाठिंबा दिला. घाणेकर यांनी सांगितले की, शहरात घनकचऱ््याचा प्रश्न आहे. स्वच्छता केली जात नाही. कचरा उचलला जात नाही. रस्त्यावरील धूळीचा नागरीकांना त्रास आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही. ५ तारखेला केलेल्या पत्र व्यवहाराची दखल आज घेतली जात आहे. याचाल गतीमान प्रशासन म्हणायचे का असा सवाल आहे. धूळ स्वच्छतेकरीता महापालिकेने टेंडर काढले आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. प्रत्यक्षात काम कुठे आहे हा खरा प्रश्न आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितले की, पावसाळ्यात खड्डे बुजविता आले नाही. त्यामुळे आत्ता खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. कचरा उचलण्याची काम सुरु आहे. तसेच महापालिकेने नुकतीच दोन धूळ शमन यंत्रे घेतली आहे. त्याद्वारे धूळ शमन केले जाणार आहे. आज झालेल्या आंदोलना संदर्भात आयुक्तांनी ३१ तारखेला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत या मुद्यावर पुन्हा चर्चा होऊन ज्या काही समस्या आहेत. त्या दूर केल्या जातील.