शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शहरातील रस्त्यावर धूळ, खड्डे आणि अस्वच्छता; सामाजिक संस्थांनी केला निषेध

By मुरलीधर भवार | Updated: October 25, 2023 16:17 IST

शालेय विद्यार्थ्यांसह सामाजिक संस्थांची केडीएमसी प्रभाग कार्यालयावर धडक

कल्याण  - शहरातील रस्त्यावर धूळ आहे. खड्डे बुजविले गेले नाही. तसेच शहरात कचरा उचलला जात नसल्याने अस्वच्छता आहे. या समस्या दूर करण्याकडे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. या समस्यांनी त्रस्त असेलल्या सेक्रेट हार्ट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करीत प्रभाग कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी शाळेच्या या आंदोलनास सामाजिक संस्थांनीही पाठिंबा देत सहभाग घेतला.

सेक्रेट हार्ट हायस्कूलचे प्रमुख अ’ल्बीन अँथोनी यांनी सांगितले की, कल्याण खडकपाडा परिसर हा सगळ्यात जास्त प्रदूषित ठिकाण आहे. २०२२ साली प्रदूषण अहवालात ते नमूद करण्यात आले आहे. ढाका, रंगून, कराची पेक्षा कल्याण डाेंबिवलीची स्थिती खराब आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. मात्र रस्त्यावरची धूळ दूर काेण करणार. खड्डे कोण भरणार याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. महापालिका अधिकारी वर्गास वारंवार पत्र व्यवहार केला जातो. त्यांच्याकडून हद्दीचा प्रश्न उपस्थित केला जातो. नागरीकांना श्वसनाचे अनेक आजार होत आहेत. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अधिकाऱ््यांच्या निष्काळजीपणाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण आयुक्तांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही.

या आंदोलनास जागरुक नागरीक फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी सक्रिय पाठिंबा दिला. घाणेकर यांनी सांगितले की, शहरात घनकचऱ््याचा प्रश्न आहे. स्वच्छता केली जात नाही. कचरा उचलला जात नाही. रस्त्यावरील धूळीचा नागरीकांना त्रास आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही. ५ तारखेला केलेल्या पत्र व्यवहाराची दखल आज घेतली जात आहे. याचाल गतीमान प्रशासन म्हणायचे का असा सवाल आहे. धूळ स्वच्छतेकरीता महापालिकेने टेंडर काढले आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. प्रत्यक्षात काम कुठे आहे हा खरा प्रश्न आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितले की, पावसाळ्यात खड्डे बुजविता आले नाही. त्यामुळे आत्ता खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. कचरा उचलण्याची काम सुरु आहे. तसेच महापालिकेने नुकतीच दोन धूळ शमन यंत्रे घेतली आहे. त्याद्वारे धूळ शमन केले जाणार आहे. आज झालेल्या आंदोलना संदर्भात आयुक्तांनी ३१ तारखेला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत या मुद्यावर पुन्हा चर्चा होऊन ज्या काही समस्या आहेत. त्या दूर केल्या जातील.