शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

डोंबिवली रेल्वे स्थानक झाले डम्पिंग ग्राऊंड; KDMC नं उचललं कठोर पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 20:04 IST

कचऱ्याचा अधिभार ठेकेदाराकडून वसूल करणार

कल्याण  - डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी ब्रीज खाली असलेल्या कच-याला आग लागली होती. ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होत. याअगोदरही कच-यामुळे  आग लागल्याचे प्रकार झाले आहेत. रेल्वे स्थानकातील प्लटफॉर्म क्रमांक एक खाली मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन डम्पिंग  ग्राऊंड होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कच-याची  आज महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी पाहणी केली. आतापर्यंतच्या कचऱ्याचा अधिभार ठेकेदाराकडून  वसूल करणार असंही कोकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी, दुकानदार, फेरीवाले, स्टॉलधारक यांच्यामुळे तयार होणारा कचरा गोळा करून हा कचरा रेल्वेच्या पादचारी पुलाखाली गोळा केला जातो. महिनाभरापासून हा कचरा उचलण्यात आला अचानक या साचलेल्या ढिगाला आग लागली. या कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने स्थानकाच्या सुरक्षेसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.हा कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याचं सांगत   स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासनाने या कच-याची सुका आणि ओला अशी विगतवारी करत विल्हेवाट लावावी अशा सूचना संबंधित रेल्वेच्या ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यत महापालिकेने रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतून किती कचरा उचलला आहे याची माहिती घेत त्याचा अधिभार ठेकेदाराकडून वसूल केला जाणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.तर स्टेशन परिसरातील  अस्वच्छतेमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असून अस्वच्छता खपवून घेणार नसल्याची तंबी देखील  ठेकेदाराला देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसात ठेकेदाराकडून कोणती भूमिका घेतली जाते? ते पहावं लागेल. तसेच एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरचं रेल्वे प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका