शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही?"

By अनिकेत घमंडी | Updated: May 24, 2024 18:48 IST

"महायुतीचे सरकार स्फोट, अपघाताची वाट बघत होते का?" डोंबिवलीत स्फोटाच्या घटनास्थळाची पाहणी केल्यावर अंबादास दानवेंचा सवाल

अनिकेत घमंडी, डोंबिवली: सोनारपाडालगत असलेल्या अंबर (अमुदान) केमिकल कंपनीच्या रिऍक्टरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी घडली. त्या घटनेत ११ कामगारांचा मृत्यू झाल्याने शुक्रवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळीची पाहणी केली. त्यावेळी मध्यमांशी बोलताना दानवे यांनी थेट महायुतीवर टीका केली. अडीच वर्षापूर्वी येथील पाच केमिकल कंपनीचे स्थलांतराचा निर्णय झाला होता, मात्र तरीही आताचे सरकार अपघाताची वाट पाहत होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की,अडीच वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका घटनेमुळे डोंबिवलीत अशा कंपन्याची पाहणी केली होती. त्यावेळी पाच केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याचा त्या सरकारने निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकार बदलले, मात्र आताच्या महायुतीच्या सरकारने याकडे का लक्ष दिले नाही. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी आले होते. त्यांनी कंपन्यांन्या स्थलांतरीत करण्याचे जाहीर केले असले तरी इतके दिवस हे सरकार का शांत बसले होते. हे सरकार अपघाताची वाट पाहत होते का? असे ते म्हणाले. या भीषण स्फोटाबाबत आम्ही सरकारला जाब विचारत आहोत. उद्योग व्यवसायांना सुरक्षा देणे ही जबाबदारी एमआयडीसी व महापालिकेचीही आहे. डोंबिवलीत याधीही स्फोट झाले होते.

बॉयलरबाबत धोरण असले तरी रिऍक्टरबाबत अद्याप सरकारचे कोणतेही धोरण नाही. रिऍक्टरबाबत सरकारने धोरण आखावे अशी मागणी त्यांनी केली. पुढे दानवे यांनी आद्योगिक सुरक्षीततेसाठी असलेल्या डिश विभागावरहि तशोरे ओढले. या घटनेला फक्त कारखान्याचे मालकच नव्हे तर औद्योगिक सुरक्षा विभागहि जबाबदार आहे. घातक केमिकल वापरणे कारखाने गुन्हा आहे. ज्या कंपनीत रिऍक्टरचा वापर होतो त्याठिकाणी टेक्निकल माणूस असलाच पाहिजे असा नियम आहे. पण इकडे तसे काही दिसत नाही. सध्या कामगारांचे काम नाही. रिऍक्टर कुठून खरेदी केले जाते? कधी खरेदी केले? कुठे लावले जाते नोंद होऊ शकते.

आता कोणतेही धोरण नसल्याने सरकारकडे माहिती नाही.वास्तविक पाहता ओद्योगिक सुरक्षा विभागाने दर महिन्याला पाहणी करून तपासणी केली पाहिजे, त्याचे रिपोर्ट सादर केले पाहिजे. परंतु सरकारचे डिश विभाग फक्त नुसता कागदावर आहे. ते खाते मजबूत करावे किंवा ते खातेच नसावे असा टोला त्यांनी लगावला. त्यावेळी त्यांच्या समवेत वैशाली दरेकर, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आदी उपस्थित होते. दरम्यान त्यांनी नुकसान झालेल्या अन्य काही कंपन्यांच्या मालकाशी संपर्क साधून त्यांना धीर दिला.

या घटनेचे गंभीर दाखल घेत कारखानदारावर गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे. औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांची, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल. यात पर्यावरण विभागाचाही भूमिका आहे. या सर्व विभागाची चौकशी होणे आवश्यक आहे. आम्ही सरकारला चौकशी करायला भाग पाडू असे ते म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोटAmbadas Danweyअंबादास दानवे