शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वेगवेगळे झोन न करता उद्योग उभे राहिलेच कसे? आरसीसी कन्सल्टंट माधव चिकोडींचा सवाल

By अनिकेत घमंडी | Updated: June 14, 2024 12:13 IST

Dombivali MIDC News: डोंबिवली शहरात रासायनिक कंपन्यांत होणाऱ्या स्फोटांच्या मालिकेला एमआयडीसीचे सदोष धोरण जबाबदार असल्याची टीका प्रख्यात आरसीसी कन्सल्टंट, नगररचना अभ्यासक माधव चिकोडी यांनी केली.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - शहरात रासायनिक कंपन्यांत होणाऱ्या स्फोटांच्या मालिकेला एमआयडीसीचे सदोष धोरण जबाबदार असल्याची टीका प्रख्यात आरसीसी कन्सल्टंट, नगररचना अभ्यासक माधव चिकोडी यांनी केली. प्लॉटची रचना करताना नियमांची पायमल्ली झाली असून झोनिंग न करता कंपन्या कशा उभारल्या? इंजिनिअरिंग उद्योगांशेजारी केमिकल कंपन्या उभ्या राहिल्याच कशा, असा सवाल चिकोडी यांनी केला. उद्योजक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कायद्याचे काटेकोर पालन न केल्याने डोंबिवलीकरांच्या पाचवीला विघ्न पुजले आहे.

औद्योगिक प्लॉटची रचना ही त्याच्या वापरावर आणि उत्पादनांवर अवलंबून असते. रासायनिक, औषधी, अभियांत्रिकी, घातक रसायनी, गोडाऊन, व्यावसायिक गाळे इत्यादी विविध उद्योगांचे झोनिंग झाल्यास  सांडपाणी, पाण्याची आवश्यकता, विजेची आवश्यकता याचे प्लॅनिंग करणे सोपे होते. सगळ्यात कहर म्हणजे औद्योगिक क्षेत्राची विभागणी फेज एक आणि फेज दोन अशी करून दोघांच्या मध्ये रहिवासी विभागाची रचना असे उदाहरण जगाच्या पाठीवर क्वचितच पाहायला मिळेल, अशी टीका त्यांनी केली. कायद्याप्रमाणे इमारतीच्या चारही बाजूस जागा सोडणे बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले. 

नियमांना हरताळअनागोंदी कारभारामुळे होणारे परीक्षण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांचे काम सोपे होते; परंतु बहुतांश कंपन्या नियमांना हरताळ फासत असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामधील अधिकाऱ्यांचे फावते. देवाण-घेवाण करून अनधिकृत गोष्टी नियमित केल्याचाही आरोप चिकोडींनी केला. 

सरकारी अधिकारी हाेतात मालामालएमआयडीसीचा आराखडा तयार केला तेव्हा बफर झोन, उद्याने, क्रीडांगणे, मोकळी जागा, नाले, नाल्याच्या बाजूची राखीव जागा याचा समावेश होता. गेल्या काही वर्षांत जमिनीचे भाव वधारल्याने एमआयडीसीने वरील सर्व राखीव जागा भूमाफियांच्या मदतीने विकायला काढल्या आणि बक्कळ पैसे कमावला. यामध्ये सरकार दप्तरी पैसे जमा झाला आणि सरकारी अधिकारी मालामाल झाले. या सर्वांना पाठीशी घालणारे स्थानिक राजकारणीही मालामाल झाले. सामान्य माणूस हा यंत्रणेचा बळी ठरल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी