शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

Dombivali: एक रात्र कवितेची उपक्रमाला ५२ कवींची उपस्थिती, एक से एक बहारदार कविता केल्या सादर

By अनिकेत घमंडी | Updated: April 29, 2024 14:12 IST

Dombivali News: काव्यरसिक मंडळ, डोंबिवली हे एक कवितेचे विद्यापीठ आहे. येथे कविते मागचे व्याकरण, दोन ओळीं मधला संवाद याचा उहापोह होतो, आणि उत्तम कवितांचे दर्शनही घडते. डोंबिवली शहराने जशी गुढीपाडव्याची शोभायात्रा प्रथम सुरू केली,

- अनिकेत घमंडी डोंबिवली - काव्यरसिक मंडळ, डोंबिवली हे एक कवितेचे विद्यापीठ आहे. येथे कविते मागचे व्याकरण, दोन ओळीं मधला संवाद याचा उहापोह होतो, आणि उत्तम कवितांचे दर्शनही घडते. डोंबिवली शहराने जशी गुढीपाडव्याची शोभायात्रा प्रथम सुरू केली, त्याचप्रमाणे काव्यरसिक मंडळ, डोंबिवली यांनी एक रात्र कवितेची हा कवितेचा जागरही डोंबिवलीत प्रथम सुरू केला. आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया कवींनी व्यक्त।केली. निमित्त होते एक रात्र कवितेची हा कार्यक्रम झाला त्याला तब्बल ५२ कवींनी नावे नोंदविली होती. त्यात नासिक मुंबई नवी मुंबई भाईंदर पासून कवी उपस्थित होते.

कार्यक्रमाला अध्यक्ष, आघाडीचे कवी लेखक किरण येले आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य, आणि सावंतवाडीचा मालवणी चेहरा दादा मडकईकर हे लाभले होते. संस्थेच्या सचिव दयाताई घोंगे, यांनी सुरुवातीचे सूत्रसंचालन केले. दीप प्रज्वलनानंतर अध्यक्षा उज्ज्वला लुकतुके यांच्या हस्ते अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार झाला. येले यांची ओळख करून देताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक कवी संवेदनशील असतोच पण ही संवेदना जेव्हा त्यांच्या कृतीत दिसते तेव्हाच, ह्या हृदयीचे बोल त्या हृदयापर्यंत पोहोचतात. येले हे याच प्रकारातले साहित्यिक आहेत. त्यांनी कोरोना काळात स्वतः झाडे लावून, उद्यान तयार केले आणि प्राथमिक शाळेतील मुलांशी संवाद साधून त्यांना दिशा दाखवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर येले यांनी आम्ही चिल्लर सुटे पैसे भुक्कड, तुम्ही बंद नोटा फक्कड, बाई नखे वाढवते पण आयुष्यभर फक्त रंगवत राहते, तसेच 'सीतेने खूप पत्रे लिहिली होती भूर्जपत्रांवर, अग्नी परीक्षेच्या आदल्या रात्री वगैरे कविता वाचून रसिकांची वाहवा मिळवली. दुसऱ्या फेरीला सुरुवात करताना, जयंत कुलकर्णी यांनी मै तो अकेले मजे मे था, मुझे आप किस लिये मिल गये? या मजरहू सुलतानपुरी यांच्या शेराने, श्रेष्ठ गजलकार श्री. प्रशांत वैद्य या आमंत्रित पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यांच्या सगळ्या गझल खूप भाव खाऊन गेल्या. जुने किती अन नवे किती, या शहराला तडे किती? सांग उजेडा तुझ्या मध्ये, सूर्य किती काजवे किती? तसेच "मनात माझे नाव तुझ्या पण अधरी नाही. तुझ्या एवढा पाऊस सुद्धा लहरी नाही" वगैरे अप्रतिम गझल सादर केल्या.

यानंतर कवींनी दुसऱ्या कवींच्या कविता वाचायच्या होत्या. ही फेरी अत्यंत बहारदार होती. त्यानंतर पाहुणे कवी दादा मडकाईकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी फेरी रंगली. आनंद पेंढारकर यांनी त्यांचा परिचय करून देताना स्वतःच्या मालवणी कवितांना क्लासिकल गाण्याच्या चाली लावून म्हणणे आणि फड जिंकणे, हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित केले तसेच त्यांनी मालवणी शब्द आणि म्हणी संकलित केल्या आहेत वगैरे माहिती दिली. दादा मडकईकर यांनी "पळस फुललो रानात, पळस फुललो मनात!... चांदण्याची फुला खोल खोल दरीत गो".. वगैरे कविता म्हणून रसिकांची मने जिंकली. नाशिकहून आलेले श्री नंदन रहाणे यांची गवळण, अध्यक्षा उज्वला लुकतुके यांची बहिणाबाई वरील कविता, निशा काळे यांची 'भय', मृणाल केळकर यांची चाल लावून सादर केलेली महानोर यांची कविता. यांनी।केल्या।कविता सादर...

याचबरोबर मेघना पाध्ये, विजय जोशी, आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम, जयंत कुलकर्णी, महेश देशपांडे, कल्याणचे योगेश वैद्य, दया घोंगे, विजय बेंबाळकर, अंजली बापट, मगदूम मॅडम, मेघना पाटील, सानिका गोडसे, वैदेही जोशी, प्रज्ञा कुलकर्णी, स्वाती भाट्ये, संदीप मर्ढेकर, वर्षा पाटील, संगीता पाखले, वैभव वऱ्हाडी, जितेंद्र लाड विशाल राजगुरू, राजेश देवरुखकर, सुधीर चित्ते, मनोज मेहता, पंकज जावळेकर, संदीप कळंबे,भाईंदरचे नमाई, रवींद्र सोनावणे, कल्पना गवरे, सखाराम आचरेकर, नागेश नायडू, विलास वाव्हळ, रवींद्र पाटील, हर्षल आचरेकर, अश्विनी म्हात्रे, प्रमोद पाटील, राजेश देवरुखकर, सखाराम आचरेकर, सुरेखा मालवणकर, नागेश नायडू, रवींद्र पाटील, संदीप कळंबे आदींमुळे कार्यक्रम संपन्न झाला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली