शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दिवा रेल्वे स्थानकाची वाटचाल अपघात शून्य स्थानकाकडे; गेल्या महिन्याभरात एकही अपघात नाही

By अनिकेत घमंडी | Updated: September 18, 2023 19:23 IST

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश; स्थानकात सरकता जिना बसवल्याने प्रवाशांचे रेल्वे फाटक ओलांडणे बंद.

डोंबिवली-  सातत्याने रुळ ओलांडताना अपघात होत असल्याने दिवा रेल्वे स्थानकाचे नाव अधिक अपघात होणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या यादीत येत होते. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांनी रेल्वे फाटक ओलांडू नये यासाठी स्थानकाच्या पूर्व दिशेला कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून स्वयंचलित जिना बसविण्यात आला. त्यामुळे  प्रवाशांचे जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडणे बंद झाले असून गेल्या एक महिन्याच्या कालावधीत इथे एकही रेल्वे अपघाताची नोंद झालेली नाही. याबद्दल सर्वच स्तरातून आणि विशेषतः प्रवाशांकडून खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले जात आहेत. मध्य रेल्वेवरील स्थानकांमध्ये ठाणे, डोंबिवली या स्थानकांबरोबरच दिवा स्थानक हे कायम गर्दीने गजबजलेल्या स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकातून शहराच्या पूर्वेला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र स्थानकाला शहराच्या पूर्व भागाला जोडणाऱ्या पुलावर केवळ दोनच अरुंद जिने असल्याने तिथे कायम चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. यामुळे बहुतेक प्रवासी थेट रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. २०२२ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना १७१ प्रवाशांना प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. २०२३ मध्ये  ऑगस्ट महिन्यापर्यंत ११० प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. केवळ जुलै महिन्यात २१ प्रवाशांचा दिवा रेल्वे स्थानकात वेगवेगळ्या अपघातात  मृत्यू झाला आहे. अपघातांचे मुख्य कारण हे रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करणे होते.

दिवा स्थानकात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी अपुरी व्यवस्था असल्यामुळे बहुतेक प्रवासी  रेल्वे रूळ ओलांडण्याचा पर्याय निवडत होते. दिव्यातील ९० टक्के लोकसंख्या पूर्वेला राहत असूनही या दिशेला तिकिट खिडकी नव्हती. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी दिवा स्थानकात पूर्वेला पाहिले टिकिट घर उभारल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा पूर्वेला सरकता जिना बसविण्याचे काम मार्गी लावले. गेल्या महिन्यात १६ ऑगस्टला या सरकत्या जिन्याचे लोकार्पण प्रवासी संघटना आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी मध्य रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिवा रेल्वे फटकाची पाहणी करून सरकत्या जिन्याचं पर्याय उपलब्ध झाल्याने रेल्वे फाटक प्रवाशांच्या रहदरीसाठी पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले. १७ ऑगस्ट २०२३ पासून रेल्वे रूळ ओलांडणे पूर्णतः बंद झाल्यामुळे दिवा रेल्वे स्थानकात महिनाभरात रेल्वे रूळ ओलांडताना एकही अपघात झाला नाही. प्रवाशांना सरकत्या जिन्याचा पर्याय मिळाल्याने इतर अरुंद जिन्यांवरील गर्दीही कमी झाली आहे.

दिवा रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना चढणारे आणि उतरणारे असे प्रत्येकी २ सरकते जिने बसवण्यात आले आहेत. हे जिने दोन्ही पुलांना जोडण्यात आले असून सोबतच आठही प्लॅटफॉर्मवरून खाली उतरता येऊ नये यासाठी बॅरिकेडिंग केले आहे.  त्यामुळे प्रवाशांना रेल्वे गेटकडे जाताच येणार नाही. तरीही एखादा प्रवासी रुळात आल्यास २४ तास रेल्वे पोलिसांची गस्त असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. या उपाययोजनांमुळे गेल्या एक महिन्यात दिवा रेल्वे स्थानकात एकही अपघात झालेला नाही.- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे