शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 00:16 IST

अंबरनाथ, बदलापूरकरांसाठी पुढच्या चार महिन्यात 'मेट्रो'चे काम सुरू करणार- देवेंद्र फडणवीस

अंबरनाथ: अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना जास्तीत जास्त फायदा होईल, अशी मेट्रो सेवा देण्याचे काम सरकार करत आहे. मेट्रो-14चे काम येत्या चार महिन्यात सुरू केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथमध्ये झालेल्या जाहीर सभेत दिली. अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता आलो नाही. ज्यांच्याजवळ विकासाचा अजेंडा नसतो ते टीका करतात, असेही फडणवीस म्हणाले. चार्टड अकाउंट नगराध्यक्ष उमेदवार सर्वांचा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा त्यांचा हिशोब करतील. आपल्याला नगरपालिकेत पारदर्शी कारभार आणायचा आहे. याठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही, कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही, तर एकप्रकारे पारदर्शीपणे काम करणारी नगरपालिका आपल्याला तयार करायची आहे, असे ते म्हणाले.

आपण निवडणुकीत बाता मारणारे लोक नाही, भविष्यकाचा विचार करणारे लोक आहोत. अंबरनाथ-बदलापुरात काँक्रिट रस्ते आणि विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. ३७० किमी मेट्रो लाईनचा प्रकल्प तयार केला असून जवळपास २ लाख कोटींची कामे सुरु केली आहेत. मेट्रोचे नेटवर्क तयार करण्यात येत आहे. मेट्रो ५, १२, आणि १४ चा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मेट्रो १४ चा सर्वाधिक फायदा मोठा अंबरनाथला होणार आहे. कांजूरमार्ग ते अंबरनाथ ही मेट्रो होणार आहे. तसेच कल्याण-बदलापूर ३ व ४ रेल्वे मार्गिकेचे काम वेगाने सुरु केले असून अधिकचे डब्बे लावणे सुरु केले," असेही ते म्हणाले.

रेल्वे मंत्र्यांना सांगून १५ डब्याची लोकल सुरु झाली पाहिजे. सरकारने निर्णय केला असून पुढील ३ वर्षात लोकलचे सर्व डब्बे एसीचे करू. त्यांचे दरवाजे बंद होणार आहेत, विशेष म्हणजे लोकलच्या द्वितीय श्रेणी डब्याचा जो तिकीट दर आहे, त्यात एक रुपयाही वाढवणार नाही. तेच दर एसी लोकलचे राहतील. शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी ताण येत आहे. त्यामुळे नगरपालिका, महापालिका पाण्याचा कोटा वाढवून मागण्यासाठी भांडत असतात. त्यामुळे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शीलार आणि पोशीर धरणाचे टेंडर केले असून काम सुरु आहे. त्यामुळे एमएमआर रिजनचा पाणी प्रश्न मिटणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकKalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसambernathअंबरनाथ