शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले

By प्रशांत माने | Updated: November 1, 2022 21:24 IST

' सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे.'

कल्याण:  सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे. काही लोक एकत्र आल्याशिवाय सत्ता काबीज करता येत नाही. त्यामुळे मी अनेकवेळा ऐक्याची भुमिका मांडलेली आहे. परंतू रिपाई एकत्र होत नाही. अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमधील कार्यक्रमात व्यक्त केली.

दलित पँथर चळवळीला मंगळवारी ५० वर्षे पुर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ विठ्ठल शिंदे लिखित ‘दलित पँथर क्रांतिकारी नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आठवले बोलत होते. आचार्य अत्रे रंगमंदिर याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक शिंदे आणि  साहीत्यिक प्रा. डॉ प्रदीप आगलावे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले दलित पँथर चवताळून उभा राहीला, तो अन्याय करणा-यांविरोधात. आमच्या पोटात आग पेटली होती न्यायासाठी स्वत: उध्वस्त होणे अशी भुमिका आम्ही घेतली होती. विनाकरण कोणाला उध्वस्त करणारे नव्हतो. पँथरच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी घरादाराची पर्वा केली नाही. दलित पँथरमध्ये फुट पडली नसती तर रिपाईचे ऐक्य कायम राहीले असते.

राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात मतभेद झाले नसते  तसेच मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवाद उभा राहीला नसता तर आज चित्र वेगळे असते. परंतू मार्क्‍सवादापेक्षा आंबेडकरवाद व्यापक  आहे असे माझे मत आहे. मार्क्‍सवादाच्या पलीकडे जाणारा असा आंबेडकर वाद आहे. सर्वाना एकत्र घेतले पाहिजे अशी भुमिका डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देखील घेतली होती याकडे आठवलेंनी यावेळी लक्ष वेधले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण