शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले

By प्रशांत माने | Updated: November 1, 2022 21:24 IST

' सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे.'

कल्याण:  सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे. काही लोक एकत्र आल्याशिवाय सत्ता काबीज करता येत नाही. त्यामुळे मी अनेकवेळा ऐक्याची भुमिका मांडलेली आहे. परंतू रिपाई एकत्र होत नाही. अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमधील कार्यक्रमात व्यक्त केली.

दलित पँथर चळवळीला मंगळवारी ५० वर्षे पुर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ विठ्ठल शिंदे लिखित ‘दलित पँथर क्रांतिकारी नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आठवले बोलत होते. आचार्य अत्रे रंगमंदिर याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक शिंदे आणि  साहीत्यिक प्रा. डॉ प्रदीप आगलावे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले दलित पँथर चवताळून उभा राहीला, तो अन्याय करणा-यांविरोधात. आमच्या पोटात आग पेटली होती न्यायासाठी स्वत: उध्वस्त होणे अशी भुमिका आम्ही घेतली होती. विनाकरण कोणाला उध्वस्त करणारे नव्हतो. पँथरच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी घरादाराची पर्वा केली नाही. दलित पँथरमध्ये फुट पडली नसती तर रिपाईचे ऐक्य कायम राहीले असते.

राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात मतभेद झाले नसते  तसेच मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवाद उभा राहीला नसता तर आज चित्र वेगळे असते. परंतू मार्क्‍सवादापेक्षा आंबेडकरवाद व्यापक  आहे असे माझे मत आहे. मार्क्‍सवादाच्या पलीकडे जाणारा असा आंबेडकर वाद आहे. सर्वाना एकत्र घेतले पाहिजे अशी भुमिका डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देखील घेतली होती याकडे आठवलेंनी यावेळी लक्ष वेधले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण