शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उल्हासनगरात कोट्यवधींचा खर्च होऊनही उद्यानाची दुरावस्था

By सदानंद नाईक | Updated: May 6, 2023 18:27 IST

महापालिका बांधकाम विभागाच्या कारभार चव्हाट्यावर

सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका उद्यानाच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही उद्यानाची दुरावस्था झाली. नेताजी गार्डनची दुरावस्था सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, महापालिका बांधकाम विभागाच्या कारभार चव्हाट्यावर आला आहे.

 उल्हासनगर महापालिका अंतर्गत ६३ पेक्षा जास्त उद्याने शहरात असून त्यांच्या नूतनीकरण, सुशोभीकरण व पुनर्बांधणी साठी दरवर्षी कोट्यवधी रुपये महापालिका खर्च करीत आहे. महापालिकेने कॅम्प नं-५ येथील नेताजी उद्यान, सरोजिनी नायडू उद्यान, विजय भारत उद्यान व पुष्प पावन उद्यान यांच्या सुशोभीकरणासाठी तब्बल अड्डीच कोटीच्या निधीला गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. तसेच शहराच्या इतर उद्यानाच्या सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी महापालिकेने मंजूर केला. मात्र मंजूर झालेले काम झालें का? याबाबत स्थानिक नागरिकांसह विविध पक्षाच्या नेत्यांची प्रश्न उपस्थित केला. कॅम्प नं-५ येथील नेताजी उद्यानाची दुरावस्था झाली असून भंगारचोरांनी उद्याच्या संरक्षण भिंती मधील लोखंडी जाळी चोरणे सुरू केली. संरक्षण भिंतीवरील लोखंडी जाळी चोरीला गेल्याने, रात्रीच्या वेळी गर्दुल्ले, नशेखोर, भुरटे चोर आदींच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. 

शहरातील सर्वच उद्यानाची दुरावस्था नेताजी व लालसाई उद्याना सारखी झाल्याने, महापालिका करीत असलेला कोट्यवधींचा खर्च गेला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. शहरातील रस्ते, साफसफाई, प्लास्टिक कचऱ्याने तुंबलेले नाले, पाणी टंचाई आदी समस्या महापालिका आयुक्ता समोर उभे ठाकले असून आयुक्त कारवाई का करीत नाही?. असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या पाच वर्षात उद्यानावर कोट्यवधींचा खर्च होऊनही उद्यानाची दुरावस्था का?. सुरक्षा रक्षक काय करतात? अभियंता व बांधकाम विभागाचे याकडे लक्ष नाही का? आजी-माजी नगरसेवकांनी बघायची भूमिका घेतली का? ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई का नाही? असे अनेक प्रश्न उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख यांच्या कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर