शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उल्हासनगरात कोट्यवधींचा खर्च होऊनही उद्यानाची दुरावस्था

By सदानंद नाईक | Updated: May 6, 2023 18:27 IST

महापालिका बांधकाम विभागाच्या कारभार चव्हाट्यावर

सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका उद्यानाच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही उद्यानाची दुरावस्था झाली. नेताजी गार्डनची दुरावस्था सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, महापालिका बांधकाम विभागाच्या कारभार चव्हाट्यावर आला आहे.

 उल्हासनगर महापालिका अंतर्गत ६३ पेक्षा जास्त उद्याने शहरात असून त्यांच्या नूतनीकरण, सुशोभीकरण व पुनर्बांधणी साठी दरवर्षी कोट्यवधी रुपये महापालिका खर्च करीत आहे. महापालिकेने कॅम्प नं-५ येथील नेताजी उद्यान, सरोजिनी नायडू उद्यान, विजय भारत उद्यान व पुष्प पावन उद्यान यांच्या सुशोभीकरणासाठी तब्बल अड्डीच कोटीच्या निधीला गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. तसेच शहराच्या इतर उद्यानाच्या सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी महापालिकेने मंजूर केला. मात्र मंजूर झालेले काम झालें का? याबाबत स्थानिक नागरिकांसह विविध पक्षाच्या नेत्यांची प्रश्न उपस्थित केला. कॅम्प नं-५ येथील नेताजी उद्यानाची दुरावस्था झाली असून भंगारचोरांनी उद्याच्या संरक्षण भिंती मधील लोखंडी जाळी चोरणे सुरू केली. संरक्षण भिंतीवरील लोखंडी जाळी चोरीला गेल्याने, रात्रीच्या वेळी गर्दुल्ले, नशेखोर, भुरटे चोर आदींच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. 

शहरातील सर्वच उद्यानाची दुरावस्था नेताजी व लालसाई उद्याना सारखी झाल्याने, महापालिका करीत असलेला कोट्यवधींचा खर्च गेला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. शहरातील रस्ते, साफसफाई, प्लास्टिक कचऱ्याने तुंबलेले नाले, पाणी टंचाई आदी समस्या महापालिका आयुक्ता समोर उभे ठाकले असून आयुक्त कारवाई का करीत नाही?. असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या पाच वर्षात उद्यानावर कोट्यवधींचा खर्च होऊनही उद्यानाची दुरावस्था का?. सुरक्षा रक्षक काय करतात? अभियंता व बांधकाम विभागाचे याकडे लक्ष नाही का? आजी-माजी नगरसेवकांनी बघायची भूमिका घेतली का? ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई का नाही? असे अनेक प्रश्न उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख यांच्या कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर