शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण दुर्गाडी खाडीवरील नव्या पूलाच्या दोन लेनचे लोकार्पण ३१ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:48 IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण; शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती

 

कल्याण-भिवंडी-कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहा पदरी पूलापैकी दोन लेनचे काम पूर्ण झाले आहे. या दोन लेनचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३१ मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. दोन लेनच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी आज आमदारांनी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.याप्रसंगी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी रविंद्र कपोते, शरद पाटील, प्रभूनाथ भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावरील दुर्गाडी खाडीवरील दोन लेनचा पूल हा वाहतूकीसाठी अपुरा पडत होता. त्याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होती. ही कोंडी दूर करण्यासाठी खाडीवर सहा पदरी पूल तयार करण्यास मंजूरी देण्यात आली होती. या पूलाचे काम २०१६ रोजी सुरु करण्यात आले. मात्र नेमलेल्या कंत्रटदाराकडून संथगतीने काम सुरु असल्याने कंत्रटदाराकडून काम काढून घेण्यात आले. त्याठिकाणी टी अॅण्ड टी कंपनीला देण्यात आले. या कंपनीने कामाला गती दिली. मात्र २०१९ साली अतिवृष्टीचा कामाला फटका बसला. त्यापाठोपाठ २०२० मध्ये कोरोनाचा फटका बसला. अनेक अडचणीवर मात करीत या पूलाच्या दोन लेन पूर्णत्वास आल्या आहेत. या कामावर पालकमंत्री एकनाथ शिंदे जातीने लक्ष ठेवून होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या दोन लेन मार्गी लागल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले. दोन लेन खुल्या केल्याने अस्तित्वात असलेल्या जुन्या पूलाच्या दोन लेन आणि नव्या पूलाच्या दोन लेन अशा मिळून चार लेन वाहतूकीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी आमदार भोईर यांनी केली. यावेळी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी सीएनजी पेट्राले पंपाच्या नजीक मागच्या पावसाळ्य़ात नाल्या नजीक रस्ता खचला असून त्याकडे महापालिकेचे प्रशासन लक्ष देत नाही. याठिकाणी वाहने नाल्यात पडून मोठी दुर्घटना होऊ शकते याकडे लक्ष वेधले आहे. नालेसफाईच्या कामातील त्रूटी कंत्रटदाराच्या लक्षात आणून देण्याकरीता हा पाहणी दौरा असून नालेसफाई चांगली व्हावी. कुठेही पावसाळ्य़ात पाणी तुंबू नये अशा सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.