शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीत 36 दिवसांत आढळले तब्बल 22 हजार 168 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:57 IST

कल्याण पश्चिमेसह डोंबिवली पूर्व हॉटस्पॉट : रुग्ण दुपटीचा कालावधी ४३ दिवसांवर

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाने कहर केला असून, १ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत आढळलेल्या रुग्णांचा आढावा घेता गेल्या ३६ दिवसांत तब्बल २२ हजार १६८ रुग्ण आढळले आहेत. तसेच ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत कल्याण पश्चिममध्ये सात हजार ८७६ तर डोंबिवली पूर्वमध्ये सात हजार ७७४ रुग्ण आढळल्याने हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.मनपाच्या हद्दीत कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढत असून दररोज आढळणारी रुग्णसंख्या आजमितीला तेराशे ते सतराशेच्या दरम्यान आहे. मंगळवारी एक हजार ३०९ रुग्णांची भर पडल्याने आजवरची कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८६ हजार ८०६ पर्यंत पोहोचली आहे. यातील ७४ हजार १८२ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २७५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्वेत रुग्णांचा वाढता आलेख चिंताजनक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या दोन विभागांमध्ये दररोज ४८ ते ५८ च्या आसपास आढळणारी रुग्णांची संख्या आजमितीला ५०० ते ६०० च्या वर गेली आहे. ४ एप्रिलला डोंबिवली पूर्वेत ५१० तर कल्याण पश्चिमेत ६५० रुग्ण आढळले आहेत. गेल्या ३६ दिवसांतील रुग्णांची आकडेवारी पाहता डोंबिवली पूर्वेत सात हजार ७७४ तर कल्याण पश्चिमेत सात हजार ८७६ इतकी आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेतील परिस्थिती फारशी आलबेल आहे, असे नाही. त्या ठिकाणीही तीन हजार ३० डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेत तीन हजार ५४४ जणांना बाधा झाली आहे. यापाठोपाठ मांडा-टिटवाळा भागात एक हजार ६९, मोहना परिसरात ३४० तर पिसवलीत २४ रुग्ण आढळून आले आहेत. मनपा हद्दीतील रुग्णसंख्येत दिवसागणिक भरमसाट वाढ होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील झाले असून, आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.महापालिका हद्दीत मृत्यूदर १.६७ , बरे हाेण्याचे प्रमाण ८६ टक्केकोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. त्या वेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९ ते १० दिवसांवर आला होता. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात हा कालावधी २१० ते २६० दिवसांवर गेला होता. परंतु, सद्य:स्थितीला रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी आता पुन्हा ४३ दिवसांवर आला आहे. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पाहता सद्य:स्थितीला मनपाच्या हद्दीतील मृत्युदर हा १.६७ टक्के इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे.कोरोना चाचण्यांमध्ये वाढएकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मंगळवारी साडेपाच हजारांच्या आसपास नागरिकांची कोरोना चाचणी केल्याची माहिती मनपाच्या साथरोग विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या