शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: नव्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:49 IST

कल्याण-डोंबिवली शहरे : नियमांची माहिती वेळेत पोहोचलीच नसल्याच्या तक्रारी

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सोमवारी रात्री ८ पासून मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, नव्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. नव्या नियमांची माहिती प्रशासनाकडून वेळेत आमच्यापर्यंत पोहोचली नाही, अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. मिनी लॉकडाऊनच्या विरोधात नाराजी व्यक्त करताना व्यापाऱ्यांनी त्यात काही प्रमाणात सूट देण्याची मागणी केली आहे.कोरोना रुग्णांची संख्या मनपा हद्दीत झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री कर्फ्यू, तर दिवसा जमावबंदी आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शुक्रवार ते सोमवार वीकएण्ड लॉकडाऊन असणार आहे. मात्र, सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुकाने सुरू राहतील, असा व्यापाऱ्यांचा समज होता. परंतु, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने सोमवार रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील, असा आदेश केडीएमसीने सोमवारी काढला. मात्र, हा आदेश त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचला नाही. या आदेशाबाबत संभ्रमही होता. त्यामुळे काही ठिकाणी दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवली होती. पोलिसांनी उद्घोषणा करून दुकाने बंद करा; अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. तेव्हा त्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे सोमवारी मनपाने काढलेल्या नव्या आदेशामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. सरकारने तशा प्रकारचे आदेश काढताना त्यात सुस्पष्टता ठेवली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.‘१२ ते ४ व्यवसाय करू द्या’कपड्यांच्या दुकानदारांनी सांगितले की, मार्च २०२० मधील लॉकडाऊन कडक होता. त्यामुळे मागच्या वर्षी लग्न सराईत आम्हाला मोठा फटका बसला. आताही लग्न सराई आहे. अनेकांनी लग्नाच्या कपड्यांची ऑर्डर दिली आहे. आता त्यांना कपडे कसे देणार, असा प्रश्न आहे. लग्नसराईतील व्यवसायावर पाणी फेरणार आहे.  अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांतून कोरोना पसरतो का, असा सवाल कल्याणमधील व्यापाऱ्यांनी केला आहे. दुकानदारांनी किमान दुपारी १२ ते ४ दरम्यान तरी व्यवसाय करू द्यावा. सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याची मुभा द्यावी. रिक्षा, लोकल, खाजगी व सरकारी बससेवा सुरू आहे. मग आमच्यावर गंडांतर का? प्रशासनाने मिनी लॉकडाऊनचा आदेश काढताना दुजाभाव केला आहे, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.