शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

एमआयडीसीत चांगले रस्ते उखडण्याचे काम जोरात; जल, वीज वाहिन्याना धोका

By अनिकेत घमंडी | Updated: October 6, 2023 16:20 IST

जनतेचाच पैशाची नासाडी होत असल्याने या गंभीर परिस्थितीला संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. 

डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागातील काँक्रीटीकरण रस्ते हे एमएमआरडीएतर्फे बांधण्यात येत आहेत. कुठलेही पूर्व नियोजन न केल्याने आता नवीन केलेले काँक्रीटीकरण रस्ते वीज, जलवाहिन्यांना नुकसान पोहचल्याने ते चांगले रस्ते आता तोडावे/फोडावे लागत असल्याने येथील नागरिक वैतागले असून जनतेचाच पैशाची नासाडी होत असल्याने या गंभीर परिस्थितीला संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. 

आजतागायत एकूण १२ नवीन काँक्रीटीकरण रस्ते फोडण्यात आले आहेत. सद्या निवासी विभागात पाच ठिकाणी काँक्रिट रस्ते फोडण्यात आल्याचे दिसून येत असून बहुतेक या ठिकाणी वीज वाहिन्यांना नुकसान पोहचल्याने हे रस्ते फोडण्यात आले आहेत. तेथील प्रत्यक्षदर्शी जुने रहिवासी, दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले की, सुदर्शननगर मधील श्री मंजुनाथ सोसायटी आरएच ५५ समोर, गावदेवी मंदिर/संधिनी सोसायटी आरएच- ११७ जवळ, मिलापनगर तलाव रोडवरील आरएल - ४१ बंगल्या समोर, मॉडेल कॉलेज बस स्टॉप/सुगंध सोसायटी आरएच- १२ जवळ असे काँक्रिट रस्ते वीज वाहिन्यांना नुकसान पोहचल्याने तोडण्यात/फोडण्यात आले असून काम पूर्ण झाल्यावर थूकपट्टी करून साधारण लेव्हलिंग करून ते रस्ते पुन्हा बनविले जातात. 

यापूर्वी वीज वाहिन्या बरोबर पाण्याच्या पाइपलाइन, रासायनिक/घरगुती सांडपाणी वाहिन्यांना नुकसान पोहचल्याने हे काँक्रिट रस्ते फोडण्यात आले होते. डिसेंबर २०२२ मध्ये निवासी भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात सुरवात झाली होती तेव्हा अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी सदर रस्त्यांचे काम चालू करण्यापूर्वी रस्त्यांत मध्ये येणाऱ्या वीज, पाणी, सांडपाणी इत्यादींचा वाहिन्या, महावितरणचे ट्रान्सफॉर्मर, डीपी बॉक्स हे योग्य ठिकाणी बाजूला घेऊन तसेच रस्त्यांसाठी अडथळा ठरणारे वृक्ष यांची पाहणी करून त्यानंतर रस्त्यांचे काम चालू करावे अशी विनंती एमएमआरडीए, एमआयडीसी, महावितरण, लोकप्रतिनिधी यांना केली होती. 

परंतु ही बाब कोणीच गांभीर्याने घेतली नसल्याने आता नवीन काँक्रीटीकरण केलेले रस्ते खोदावे/फोडावे लागत आहेत. यापुढेही वाहिन्यांना नुकसान पोहचल्यास हे रस्ते फोडण्याचे, तोडण्याचे काम असेच कायमस्वरूपी चालू राहणार असे दिसत आहे. बऱ्याच वर्षांनी एमआयडीसी निवासीकराना चांगले काँक्रीटीकरण रस्ते मिळाले होते पण ते येणाऱ्या काही वर्षातच खराब, खड्डेमय होणार आहेत. अजूनही काही रस्ते होण्याचे बाकी आहेत त्यात तरी वाहिन्या/विजेचे डीपी बॉक्स बाजूला घेऊन रस्त्यांचे कामे करावीत अशी मागणी नागरिकांनी केली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली