शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कल्याणच्या गिर्यारोहकांनी पहिने सुळक्यावर फडकविला तिरंगा आणि भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 15:39 IST

एका तासाभरात मोहिम सर, या मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लक्ष्मण पाडा येथून जाली. सुरुवातीच्या टप्प्यात शेता लगत बांधा बांधाने जात एक लहानसा ओढा पार करावा लागतो

कल्याण - सह्याद्रीच्या द:या खो:यात गिर्यारोहनासाठी कठीण श्रेणीत मोडणा:या सुळक्यांची संख्या जास्त आहे. त्यापैकी एक पहिने सूळक्याची चढाई आणि २०० फूट खोल दरीववर ओव्हर हँग असल्याने हा सुळका अजून भयंकर वाटतो. अशा पहिने सुळक्यावर काल बालदिनानिमित्त कल्याणच्या गिर्यारोहकांनी तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवित छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.सह्याद्री रॉक अडव्हेंचर या गिर्यारोहक समूहाच्या पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजीत भोसले, भूषण पवार, प्रदीप घरत, अक्षय जमदरे, सागर डोहळे यांच्या मार्गदर्शनाखाली नितेश पाटील, लतिकेश कदम, सुनिल खनसे आदी सदस्यांनी हा सुळका सर केला आहे.

या मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लक्ष्मण पाडा येथून जाली. सुरुवातीच्या टप्प्यात शेता लगत बांधा बांधाने जात एक लहानसा ओढा पार करावा लागतो. पुढे घनदाट जंगल सुरु होते. त्यानंतर खडय़ा चढाईचा मार्ग पहिने सुळक्याच्या पायथ्या जाऊन पोहचतो. सुळका आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. खडकांच्या खाच्यांमध्ये हाता पायांच्या बोटाने मजबूत पकड करुन चिकाटीने चढाई करावी लागते. अंगावर येणारा खडक हा गिर्यारोहकांच्या मानसिक आमि शारीरीक कसोटी पाहणारा आहे. सुळक्याचा खडक काही ठिकाणी सैल आणि निसरडा असल्याने जपून आरोहण करावे लागते असा सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी सांगितला. काळजाचे ठोके चुकविणारा सुळक्याचा खडतर निसरडा मार्ग आणि बाजूला असलेली खोल दरी त्यात हुडहुडी भरविणारी थंडी, कातळकडे आहेत. एक चुकीचे पाऊल खोल दरीत विश्रंती देऊ शकते. त्याठीकाणी चुकीला माफी नाही असे हे ठीकाण आहे. या सर्व आव्हानांचा सामना करीत ही चढाई करण्यात आली. हा समूह नवीन गिर्यारोहकांसाठी घेऊन येतो. पहिने मोहिमेला लहान बालकांची उपस्थिती होती. बाल दिनाचे महत्वा या सुळक्यावर कथन करण्यात आले अशी माहिती भूषण पवार यांनी दिली.