शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सफाई गटारांची! पण गाळ आणि कचऱ्याचे ढिग जैसे थे; दुर्गंधीबरोबरच KDMC चे रोगराईलाही आमंत्रण

By प्रशांत माने | Updated: May 14, 2024 20:05 IST

पावसाळयाच्या तोंडावर लहान आणि मध्यम गटारांच्या सफाईची कामे केडीएमसीकडून सुरू आहेत.

कल्याण : पावसाळयाच्या तोंडावर लहान आणि मध्यम गटारांच्या सफाईची कामे केडीएमसीकडून सुरू आहेत. परंतू गटारीतून काढला जाणारा गाळ आणि कचरा हा तत्काळ उचलला जात नसून दुर्गंधीबरोबरच मनपाकडून रोगराईला देखील आमंत्रण दिले जात आहे का? असा सवाल वास्तव पाहता उपस्थित होत आहे. वेळेवर उचलला जात नसल्याने सध्या पडणा-या अवकाळी पावसाच्या वाहत्या पाण्यात हा गाळ आणि कचरा पुन्हा गटारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याण पश्चिमेकडील भागात ठिकठिकाणी गटार सफाईची कामे सुरू आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महमदअली चौक दरम्यानच्या रस्त्याच्या लगतच्या गटारांची देखील सहा दिवसांपुर्वी साफ सफाई केली. गटारांमधील गाळ आणि कचरा काढला परंतू तो मंगळवारी देखील उचलला गेला नव्हता. याचा त्रास रस्त्यावरून जाणा-या पादचा-यांबरोबरच इथल्या व्यापारी वर्गाला सहन करावा लागत आहे. पाच ते सहा दिवसांपासून कचरा जैसे थे पडून राहिल्याने दुर्गंधीबरोबरच रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

इथल्या व्यापारी वर्गाने केडीएमसीचे अधिका-यांना वारंवार फोन करून तसेच व्हॉटसअॅपच्या माध्यमातून रस्त्यावरील गाळ आणि कच-याचे फोटो पाठवून तक्रार देखील केली आहे. परंतू अधिका-यांकडून कामगार पाठवतो, उचलतो अशीच उत्तर व्यापा-यांना दिली जात आहेत पण प्रत्यक्षात मात्र कचरा ठिकठिकाणी जैसे थे च पडून आहे. एकिकडे स्वच्छता राखा, कचरा रस्त्यावर टाकू नका, रोगराईला आमंत्रण देऊ नका असे आवाहन केडीएमसीकडून वारंवार नागरिकांना केले जाते. परंतू वास्तव पाहता महापालिकेला स्वत:च्याच आवाहनाचा विसर पडला आहे का? असे म्हणणे उचित ठरेल.

तक्रारीची दखल नाहीगटार सफाईची कामे झाली ही समाधानाची बाब असलीतरी गटारातून काढलेला कचरा आणि गाळ सहा दिवसानंतरही रस्त्याच्या लगत पडून आहे. महापालिकेच्या अधिका-यांच्या ही बाब तक्रार तसेच व्हॉटसअॅपच्या माध्यमातून फोटो पाठवून निदर्शनास आणुन दिली परंतू तक्रारीची दखल घेतली गेलेली नाही. मनपा रोगराई पसरण्याची वाट पाहत आहे का? तातडीने कचरा उचलला जावा अशी आम्हा व्यापा-यांची मागणी आहे - हरीश खंडेलवाल, अध्यक्ष, कल्याण महानगर व्यापारी फेडरेशन

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका