शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

एमआयडीसीचे भूखंड दरात आणि हस्तांतर शुल्कात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी

By अनिकेत घमंडी | Updated: April 2, 2024 10:20 IST

विशेष म्हणजे हे परिपत्रक निवडणूक आचार संहिता लागायच्या आदल्या दिवशी काढले गेले आहे.

डोंबिवली : महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाचे प्रीमियम दरात सुधारणा करण्याचे परिपत्रक १५ मार्च रोजी एमआयडीसी कडून काढण्यात आले असून त्यामुळे औद्योगिक, निवासी, व्यापारी क्षेत्रातील भूखंडाचे दरवाढी बरोबर भूखंड समोरील रोड विड्थ चार्जेस प्रमाणात ५ ते १५% हे अतिरिक्त दर लागू होणार आहेत. विशेष म्हणजे हे परिपत्रक निवडणूक आचार संहिता लागायच्या आदल्या दिवशी काढले गेले आहे.

या भूखंड दरवाढीचा मोठा फटका डोंबिवली निवासी क्षेत्रातील नागरिकांना बसणार आहे. यापूर्वीचा डोंबिवली निवासी क्षेत्रातील भूखंडाचा दर हा . ३२०६३ रुपये प्रती चौ. मीटर हा होता आता तो दर रू. ४००९० रु. प्रती चौ. मीटर असा झाला आहे. त्यामुळे ही दरवाढ २५ टक्के झाली आहे. खरे तर डोंबिवली निवासी क्षेत्रात भाडे पट्ट्याने विकत देण्यासाठी आता भूखंड शिल्लकच राहिले नाहीत. त्यामुळे त्यात वाढ झाली तरी नागरिकांना त्याचे सोयरसुतक नाही. परंतु या नवीन प्रचलित दरामुळे मात्र हस्तांतर, मुदतवाढ, पोटभाडे इत्यादी दरात प्रचंड मोठी वाढ होणार असल्याने निवासी भागातील नागरिक भडकले असून येथील नागरिकांना आता वाढीव रक्कम यापुढे द्यावी लागणार आहे. 

आधीच ही हस्तांतर शुल्क रक्कम जास्त होती. त्यात प्रत्येक वेळी सदनिका, बंगलो, व्यापारी गाळे इत्यादी विकतांना एमआयडीसी कडे भरावयाचे हस्तांतर शुल्कात मोठी वाढ झाल्याने येथील रहिवासी आता वैतागले असून जागा विकताना शासनाला स्टॅम्प ड्युटी/रजिस्ट्रेशन फी ( 6%+1% मेट्रो टॅक्स =7% + 1% रजिस्ट्रेशन चार्जेस + वकील फी ) असे भरावे लागते. शिवाय एमआयडीसी मधील रहिवाशांना अधिक हस्तांतर शुल्क एमआयडीसी कडे भरावे लागते. या हस्तांतर शुल्कावर पण १८% जीएसटी लावत असल्याने रहिवाशांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतो. खरे तर मालमत्ता विकायचा वेळी रजिस्टर करताना १% मेट्रो टॅक्स हा मागील दोन वर्षापासून घेणे चुकीचे होते. अजून मेट्रोचा पत्ता नसताना ती चालू होण्यास कमीतकमी पाच वर्षाचा कालावधी असताना असा टॅक्स घेणे कितपत योग्य आहे.

शिवाय या एमआयडीसी भूखंड दर वाढीचा फटका ज्यांचे भाडे पट्टा (लीज) संपला असल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे आहे. तसेच जे भूखंडधारक त्यांची मालमत्ता भाड्याने देत आहेत त्यांनाही बसला आहे. याबाबत दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली निवासीमधील चार बिल्डिंग परिसरातील भूखंड क्रमांक RH ११९, १२०, १२१, १२२ या इमारतींचा भाडे पट्टा हा त्यावेळी ९५ वर्षांच्या ऐवजी फक्त तीस वर्षाचा दिल्याने त्यांचा भाडे पट्टा काही वर्षापूर्वीच संपला होता. त्यांना आता त्याचा मोठा फटका बसणार आहे. निवडणुकीचा तोंडावर असा निर्णय एमआयडीसी कडून घेण्यात आल्याने लोकांमध्ये रोष निर्माण झाला असून त्याचा रोष लोकसभा निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारांना बसणार आहे. घरोघरी येणाऱ्या आणि प्रचार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेते/कार्यकर्त्यांना येथील जनता याबद्दल जाब नक्कीच विचारणार. माननीय मुख्यमंत्री/उद्योग मंत्री यांनी यात लक्ष घालावे यासाठी समाजमाध्यम आणि पत्राद्वारे विनंती करण्यात  आल्याचे त्यांनी सांगितले. 

एमआयडीसीने भूखंड दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा किंवा त्याला स्थगिती द्यावी. नाहीतर येत्या निवडणुकीत त्याची जबर किंमत मोजावी लागेल. डोंबिवली एमआयडीसी परिसरात तीस हजार नागरिक राहत असून हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसी क्षेत्रात लागू झाल्याने त्यातील असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. निवडणुकीच्या तोंडावर असे निर्णय घ्यायला नाही पाहिजे होते.- राजू नलावडे, सचिव, डोंबिवली वेलफेअर असोसिएशन

टॅग्स :MIDCएमआयडीसीdombivaliडोंबिवली