शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

कुटुंबावर पाच वर्षे बहिष्कार; जमिनीच्या वादातून पंचांनी उचलले पाऊल

By सचिन सागरे | Updated: June 2, 2023 09:19 IST

व्यवसाय ठप्प,आर्थिक कोंडी

सचिन सागरेकल्याण : गावात लग्नकार्यात आता त्यांना बँड वाजवायला कुणी बोलावत नाही. मासेविक्रीच्या व्यवसायासाठी मुंबईतून मासे आणायला जाताना गावातील लोक सोबत घेत नाहीत. त्यांच्या  मुलांना गावातील मुले खेळायला घेत नाहीत. असे जगणे कल्याण पश्चिमेतील कोळीवाड्यात राहणारे प्रकाश विष्णू भोईर (६७) व त्यांचा लहान भाऊ विजय भोईर (६५) यांचे  कुटुंब २०१८ पासून म्हणजेच पाच वर्षांपासून जगत आहे.   यातून मार्ग काढण्यासाठी विनविण्या केल्या, पण काहीच उपयोग न झाल्याने हे कुटुंबीय मानसिक व आर्थिक विवंचनेत आहेत. 

मालकीच्या व वहिवाटीच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाचा कायदेशीर मार्गाने विरोध केल्याने हा बहिष्कार घातल्याचे भोईर कुटुंबाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे बहिष्कार घालण्यात आला नसल्याचे पंच कमिटी म्हणते.

पंच कमिटीच्या प्रमोद किसन भगत व राम गजानन भोईर यांच्यासह सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचा अर्ज बाजारपेठ पोलिस तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तृप्ती पाटील यांना दिला होता, . त्यानंतर, आमच्यासह पंच कमिटीची एकत्रित बैठक बोलावली. मात्र, पंच कमिटीने बंदी उठविण्याचे पोलिसांना दिलेले आश्वासन काही दिवसांपुरतेच राहिले. पुन्हा त्रास सुरू झाल्याचे भोईर म्हणाले. 

समाजाच्या ट्रस्टच्या मंदिराच्या जागेचा प्रश्न जोडून गावातील लोकांची दिशाभूल केली जात आहे. बहिष्काराची तक्रार पोलिसांकडे करू नये म्हणून पंचांसह त्यांचे हस्तक आमच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात खोट्या तक्रारी करीत आहेत. मुलाच्या लग्नासाठी गावातील एकही जण आला नाही. यावेळी आमच्या घरावर दगडफेकही झाली होती.विजय भोईर 

याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी बाजारपेठ पोलिसांना मी व उत्तम जोगदंड यांनी २०२१ मध्ये सांगितले होते. परंतु, त्यावेळी पंच आणि पीडित कुटुंबांची एकत्र बैठक घेऊन बहिष्काराचा प्रश्न मिटवला होता. सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या पंचांवर गुन्हा दाखल न झाल्याने त्यांना धाक नाही.     वकील तृप्ती पाटील, अंनिस, कायदा विभाग सहसचिव.

जमिनीचा वाद निर्माण झाला होता. मात्र, हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला आहे.देवानंद भोईर, उपनेते, कोळी महासंघ राज्य

भोईर कुटुंबीयांवर बहिष्कार टाकलेला नाही. गावातील सर्व कार्यक्रम आणि पालखी आणि भजनातही त्यांचा सहभाग असतो.प्रमोद किसन भगत, अध्यक्ष, पंच कमिटी.

भोईर कुटुंबीयांचे आरोप खोटे आहेत. त्यांना गावातील सर्व कार्यक्रमांत बोलावले जाते. तसेच, त्यांच्या सुख-दु:खात गावकरी सहभागी होत असतात.राम भोईर, सदस्य, पंच कमिटी

या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाकडे पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सागितले. दरम्यान, हे प्रकरण काही दिवसांपूर्वी सामोपचाराने सोडविण्यात आल्याचे बाजारपेठ पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kalyanकल्याण