शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लाखो रुपये देऊन घर तर घेतले; पण  ना प्यायला पाणी, ना जायला रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:33 IST

वसाहतीतील पाणीप्रश्न गंभीर

- मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण - शीळ रोडलगत टाटा नाकानजीक मोठी गृहसंकुल वसाहत आहे. या वसाहतीत १९ इमारती आहेत. या १९ इमारतीत १३४० सदनिका आहेत. या १३४० सदनिकाधारकांना कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे या नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. या वसाहतीमधील घरे बिल्डरने २००७ मध्ये बांधली. या घराचा ताबा ग्राहकांना दिला गेला. त्यानंतर गृह निर्माण सोसायटी २०१० मध्ये अस्तित्वात आली. 

  या मोठ्या वसाहतीचा परिसर यापूर्वी कल्याण ग्रामीण भागात होता. २७ गावेही महापालिकेत समाविष्ट नव्हती. त्यामुळे या परिसराला ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. हा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून केला जातो. आता ही वसाहत आणि २७ गावे ही महापालिकेत आहे. त्यामुळे या वसाहतीला पाणी देणे, ही जबाबदारी महापालिकेची आहे.  एमआयडीसीने पाण्याचा कोटाही वाढविला आहे. एमआयडीसीकडून केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा दाबही कमी असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. 

घरे महाग; पण ना रस्ते; ना पाणीदहा वर्षांपूर्वी वन रूम किचन बेडरूमकरिता २० ते २२ लाख रुपये मोजले होते. टू रूम वन रूम किचन बेडरूमकरिता ३५ लाख रुपये मोजले होते. घर महाग मिळाले. मात्र ना रस्ते ना पाणी. 

पावसाळ्यात पायी चालणे कठीणरस्ते व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यात रस्ते चिखलमय असतात. त्यातून वाट काढत नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते.

नालेही नाहीतसोसायटीच्या सांडपाण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही. 

घाण पाणीही रस्त्यावरसोसायटीच्या मागच्या बाजूला ड्रेनेजचे पाइप नसल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्याचा नागरिकांना त्रास होतो.

टँकरवर महिन्याला २५ हजाराचा खर्च४० सदनिकांची एक इमारत आहे. या ४० सदनिकाधारकांना टँकरने पाणी मागवावे लागते. त्यासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च होतात.

समस्या जैसे थेसोसायटीला संरक्षक भिंत नाही. तसेच पथदिव्यांची व्यवस्था नाही.     -चेतन चव्हाण, रहिवासी.

सोसायटीच्या पाणी समस्येविषयी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, कायमस्वरूपी समस्या सुटलेली नाही.     -अमरसिंग चव्हाण, रहिवासी.

या वसाहतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बूस्टर पंप बसविला आहे. मध्यंतरी एमआयडीसीकडूनच पाणीपुरवठा कमी केला जात होता. कारण जलवाहिनी फुटली होती. आठ दिवस पाण्याची समस्या होती.     -किरण वाघमारे, अभियंता, 

टँकरवर महिन्याला २५ हजाराचा खर्च४० सदनिकांची एक इमारत आहे. या ४० सदनिकाधारकांना टँकरने पाणी मागवावे लागते. त्यासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च होतात.    पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी. 

टॅग्स :kalyanकल्याण