शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

भिंवडी-कल्याण-शीळ रस्त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर

By मुरलीधर भवार | Updated: November 18, 2022 18:55 IST

बाधितांना मोबदला देण्याचा विषय पुढे सरकणार

कल्याण-भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या बाधितांना मोबदला देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीने अहवाल तयार केला असून हा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. हा अहवाल राज्य सरकारला सादर केल्याने बाधितांना मोबदला देण्याचा विषय पुढे सरकणार आहे. भिवंडी-कल्याण-शीळ या रस्त्याचे सदा पदरीकरण सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सध्या सुरु आहे. ज्याठिकाणी जागा उपलब्ध झाली. त्याठिकाणी सहा पदरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. रस्त्याचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र या रस्ते प्रकल्पातील बांधितांना अद्याप त्यांच्या जागेचा मोबदला मिळालेला नाही. या भूमिपूत्रंच्या वतीने सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने काटई येथे ५४ दिवस बेमुदत उपोषण केले.

या प्रकल्पात जवळपास अनेक शेतकरी बाधित होत आहे. त्यांना समृद्धी महामार्गाच्या धरतीवर मोबदला दिला जावा अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे. हा रस्ता दुपरी, चौपदरी आणि आत्ता सहा पदरी करताना बाधितांना मोबदला मिळालेला नसल्याची बाब युवा मोर्चाचे प्रमुख गजानन पाटील यांनी नमूद केली होती. या प्रकरणी युवा मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली होती. या रस्ते प्रकल्पातील बाधितांना मोबदला दिला गेला आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने नव्याने समिती गठीत केली. ही समिती जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली होती. या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे युवा मोर्चाने ५४ दिवसांच्या उपोषण आंदोलनानंतर आंदोलन स्थगित केले होते. तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. राज्य रस्ते विकास महामंडळासह राज्य सरकारकडे मोबदल्याची मागणी केली होती. राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नितीन बोराले यांनी युवा मोर्चाच्या पदाधिका:यांना लेखी पत्र दिले आहे. मोबदला देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. या अहवालावर बाधितांना मोबदला मिळण्याचे भवितव्य अवलंबून आहे. या अहवालात जिल्हाधिका:यांच्या समितीने काय म्हटले आहे. तो अभिप्राय पाहून राज्य सरकार पुढचा निर्णय घेणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेbhiwandiभिवंडी