शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

सावधान... तुम्हीही होऊ शकता शिकार, बतावणी करीत लुटला जातोय ऐवज!

By प्रशांत माने | Updated: April 9, 2023 18:58 IST

साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात असल्याचे घडलेल्या घटनांमधून स्पष्ट होत आहे.

डोंबिवलीः एकिकडे कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीसह दिवसा घरफोडीचे प्रकार वाढले असताना दिवसाढवळया गजबजलेल्या ठिकाणी संमोहित तसेच बोलण्यात गुंतवून भामट्यांकडून नागरिकांच्या अंगावरील  दागिने हातचलाखीने लांबविले जात आहेत. आठवडयाभरात चार घटना अशा घडल्या असून यातील तीन घटना  डोंबिवलीतील आहेत. साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात असल्याचे घडलेल्या घटनांमधून स्पष्ट होत आहे.

दोघांनी दुचाकीवरून येऊन सोनसाखळी हिसकावून पलायन करण्याच्या घटनांनी महिला वर्गात असुरक्षिततेची भावना असताना आता  गजबजलेल्या रहदारीच्या ठिकाणी पुरुष तसेच वृद्ध देखील सुरक्षित नाहीत हे आठवड्यात घडलेल्या घटनांमधून समोर आलेय. कल्याण पश्चिमेकडील डिएचएल कंपनीचे कार्यालयासमोर बस स्टॉपवर अरविंद बागल ( वय ६२) हे बसची वाट पाहत होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती तिथे आल्या आणि काका एवढे सोन्याचे दागिने घालू नका असे बोलण्यात गुंतवले आणि बागल यांच्या अंगावरील   ४६ हजाराचे दागिने हातचलाखीने लंपास केले. ही घटना ३१ मार्चला घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. उर्वरीत तीन घटना डोंबिवलीत घडल्या आहेत.

डोंबिवली पुर्वेकडील रामनगर हद्दीत ३ आणि ४ एप्रिलला अनुक्रमे  हनुमंत गोसावी (वय ५६) आणि अनिल तांबे (वय ७२) यांना बोलण्यात गुंतवून तसेच संमोहित करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने दोघा भामट्यांकडून लांबविण्यात आले. या  घटना शहीद भगतसिंग मार्ग आणि टिळकचौकात सकाळी पावणेअकरा ते दुपारी साडेबारा दरम्यान घडल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेला राजन खोत या ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला लुबाडण्यात आल्याची घटना ३ एप्रिललाच घडली. त्यांच्याकडील दोन लाखांचा सोन्याचा ऐवज दोघा भामट्यांनी हातचलाखीने लांबविला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

पोलिस असल्याची बतावणी करीत याआधी सर्रासपणे लूटले जायचे. आमच्या शेठला मुलगा झाला आहे तो गरीबांना साडया वाटतोय गरीब दिसण्यासाठी अंगावरील दागिने काढून ठेवा, पुढे खून झालाय पोलिसांची नाकाबंदी चालू आहे दागिने काढून ठेवा अशा बतावण्या करीत लुटले जायचं. गोंधळात टाकून लक्ष विचलित करुन लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरु झालेत. बतावणी करणारा भामटा इतका आत्मविश्वासाने बोलतो की त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवून नागरिक फसवणूकीला बळी पडत असल्याचे घडणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे.