शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची; इंदूराणी जाखड यांचे वक्तव्य

By मुरलीधर भवार | Updated: January 9, 2024 16:59 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे असे आदेश महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी काढले आहे.

मुरलीधर भवार,कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे असे आदेश महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी काढले आहे. बेकायदा बांधकाम कारवाईचे सरकारी आदेश आणि न्यायालयीन बाबी याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्तांची असेल. त्याकरीता त्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयातील एका याचिकेवर सुनावणी देताना न्यायालायने महापालिका आयुक्तांना २४ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश न्यायालयाने १३ जानेवारी रोजीच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत. त्या पश्चात आयुक्तांनी बेकायदा बांधकाम पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयु्तांची असेल असे आदेश काढले आहेत. बेकायदा बांधकामाची तक्रार करुन ती पाडण्याकरीता टोल फ्री नंबर दिला आहे. हा टोल फ्री क्रमांक १८००२३३४३९२ असा आहे. या टोल फ्री क्रमांकवर तक्रार केल्यास त्यानुसार बेकायदा बांधकामे पाडली जातील. बेकायदा बांधकामे पाडताना त्यांची नोंदवहीत नोंद करुन पाडायची आहेत असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

दरम्यान बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तूभ गोखले यांनी सांगितले की, महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात होणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकाऱ््याची असेल. त्याने ते पाडले नाही. तर त्याला जबाबदार धरुन त्याला निलंबित करण्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकेवर सुनावणी देताना आ’गस्ट २००७ साली दिले होते. त्याची अंमलबजावणीच केली गेली नाही. २००७ पासून प्रभाग अधिकाऱ््यानी किती बेकायदा बांधकामे पाडली. ज्यांनी पाडली नाही. त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली का तर त्याचे उत्तर शून्य असे आहे. बेकायदा बांधकामे नव्याने होऊ नयेत. ती पूर्णत: बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ कागदी आदेश काढले जातात. त्यातून परिमाण काही साधला जात नाही.

१३ जानेवारी रोजीच्या हरिश्चंदर म्हात्रे यांच्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने ६५ बेकायदा इमारतींचाही प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले की, महापालिकेने ६५ बेकायदा प्रकरणात कारवाई केल्याची माहिती दिली आहे. महापालिकेने ६५ पैकी काहीच इमारतीवर केवळ थातूरमातूर कारवाई केली आहे. त्यांनी नेमकी आणि ठाेस कारवाईच केलेली नाही. केवळ दहा एक इमारती पाडण्याचा फार्स केला आहे. ही बाब देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका