शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची; इंदूराणी जाखड यांचे वक्तव्य

By मुरलीधर भवार | Updated: January 9, 2024 16:59 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे असे आदेश महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी काढले आहे.

मुरलीधर भवार,कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे असे आदेश महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी काढले आहे. बेकायदा बांधकाम कारवाईचे सरकारी आदेश आणि न्यायालयीन बाबी याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्तांची असेल. त्याकरीता त्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयातील एका याचिकेवर सुनावणी देताना न्यायालायने महापालिका आयुक्तांना २४ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश न्यायालयाने १३ जानेवारी रोजीच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत. त्या पश्चात आयुक्तांनी बेकायदा बांधकाम पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयु्तांची असेल असे आदेश काढले आहेत. बेकायदा बांधकामाची तक्रार करुन ती पाडण्याकरीता टोल फ्री नंबर दिला आहे. हा टोल फ्री क्रमांक १८००२३३४३९२ असा आहे. या टोल फ्री क्रमांकवर तक्रार केल्यास त्यानुसार बेकायदा बांधकामे पाडली जातील. बेकायदा बांधकामे पाडताना त्यांची नोंदवहीत नोंद करुन पाडायची आहेत असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

दरम्यान बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तूभ गोखले यांनी सांगितले की, महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात होणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकाऱ््याची असेल. त्याने ते पाडले नाही. तर त्याला जबाबदार धरुन त्याला निलंबित करण्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकेवर सुनावणी देताना आ’गस्ट २००७ साली दिले होते. त्याची अंमलबजावणीच केली गेली नाही. २००७ पासून प्रभाग अधिकाऱ््यानी किती बेकायदा बांधकामे पाडली. ज्यांनी पाडली नाही. त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली का तर त्याचे उत्तर शून्य असे आहे. बेकायदा बांधकामे नव्याने होऊ नयेत. ती पूर्णत: बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ कागदी आदेश काढले जातात. त्यातून परिमाण काही साधला जात नाही.

१३ जानेवारी रोजीच्या हरिश्चंदर म्हात्रे यांच्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने ६५ बेकायदा इमारतींचाही प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले की, महापालिकेने ६५ बेकायदा प्रकरणात कारवाई केल्याची माहिती दिली आहे. महापालिकेने ६५ पैकी काहीच इमारतीवर केवळ थातूरमातूर कारवाई केली आहे. त्यांनी नेमकी आणि ठाेस कारवाईच केलेली नाही. केवळ दहा एक इमारती पाडण्याचा फार्स केला आहे. ही बाब देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका