शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची; इंदूराणी जाखड यांचे वक्तव्य

By मुरलीधर भवार | Updated: January 9, 2024 16:59 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे असे आदेश महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी काढले आहे.

मुरलीधर भवार,कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे असे आदेश महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी काढले आहे. बेकायदा बांधकाम कारवाईचे सरकारी आदेश आणि न्यायालयीन बाबी याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्तांची असेल. त्याकरीता त्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयातील एका याचिकेवर सुनावणी देताना न्यायालायने महापालिका आयुक्तांना २४ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश न्यायालयाने १३ जानेवारी रोजीच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत. त्या पश्चात आयुक्तांनी बेकायदा बांधकाम पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयु्तांची असेल असे आदेश काढले आहेत. बेकायदा बांधकामाची तक्रार करुन ती पाडण्याकरीता टोल फ्री नंबर दिला आहे. हा टोल फ्री क्रमांक १८००२३३४३९२ असा आहे. या टोल फ्री क्रमांकवर तक्रार केल्यास त्यानुसार बेकायदा बांधकामे पाडली जातील. बेकायदा बांधकामे पाडताना त्यांची नोंदवहीत नोंद करुन पाडायची आहेत असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

दरम्यान बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तूभ गोखले यांनी सांगितले की, महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात होणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकाऱ््याची असेल. त्याने ते पाडले नाही. तर त्याला जबाबदार धरुन त्याला निलंबित करण्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकेवर सुनावणी देताना आ’गस्ट २००७ साली दिले होते. त्याची अंमलबजावणीच केली गेली नाही. २००७ पासून प्रभाग अधिकाऱ््यानी किती बेकायदा बांधकामे पाडली. ज्यांनी पाडली नाही. त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली का तर त्याचे उत्तर शून्य असे आहे. बेकायदा बांधकामे नव्याने होऊ नयेत. ती पूर्णत: बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ कागदी आदेश काढले जातात. त्यातून परिमाण काही साधला जात नाही.

१३ जानेवारी रोजीच्या हरिश्चंदर म्हात्रे यांच्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने ६५ बेकायदा इमारतींचाही प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले की, महापालिकेने ६५ बेकायदा प्रकरणात कारवाई केल्याची माहिती दिली आहे. महापालिकेने ६५ पैकी काहीच इमारतीवर केवळ थातूरमातूर कारवाई केली आहे. त्यांनी नेमकी आणि ठाेस कारवाईच केलेली नाही. केवळ दहा एक इमारती पाडण्याचा फार्स केला आहे. ही बाब देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका